शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

वर्षपूर्तीची एक कुदळ खड्डेमुक्तीसाठी !

By admin | Updated: October 18, 2015 01:23 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, त्या दिवशी राज्यभरात रस्ते दुरुस्तीच्या तब्बल एक हजार कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

-  यदु जोशी,  मुंबईराज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, त्या दिवशी राज्यभरात रस्ते दुरुस्तीच्या तब्बल एक हजार कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला असून एकूण ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.राज्य आणि मुख्य जिल्हा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविली जाणार आहे. केवळ डागडुजी न करता खड्डे असलेले अर्धा, एक किलोमीटरचे अख्खे रस्तेच दुरुस्त करण्यात येणार आहेत. राज्य रस्त्यांवरील खड्डे ३० नोव्हेंबरपर्यंत बुजविण्यात येतील तर जिल्हा मार्गांची खड्डेमुक्ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी नवीन योजना आणली आहे. राज्यातील रस्ते यापुढे ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या मानकांनुसार बांधण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभही ३१ आॅक्टोबरला करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेले रस्ते बांधकाम विभागाच्या तुलनेने फारच दर्जेदार असतात. त्याच दर्जाचे रस्ते आता बांधकाम विभाग बांधेल. सूत्रांनी सांगितले की, हजारो कोटींची ही कामे करताना राजकीय भेदाभेद न करण्याचे सरकारने ठरविले आहे. केवळ भाजपा-शिवसेनेच्या आमदारांच्याच मतदारसंघांमध्ये कामे करण्याचा संकुचितपणा न दाखविता खरोखर गरज असेल तिथे कामे करण्याचे धोरण आखण्यात आले असून, वर्षपूर्तीच्या जल्लोषात यानिमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनाही सामावून घेतले जाणार आहे. 4500कोटी रुपये खर्चून राज्यातील २ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यात रस्त्यांचे रुंदीकरण, जास्तीचे थर टाकणे, आधुनिक तंत्रज्ञानाने मजबुतीकरण आदी कामांचा समावेश असेल. 500किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग यंदा बांधण्यात येतील. त्यावर एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुढील वर्षी एक हजार कोटी रुपये खर्चून आणखी ५०० किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2015-16च्या अर्थसंकल्पात बांधकाम विभागासाठी करण्यात आलेल्या तरतुदीव्यतिरिक्तचा निधी या कामांसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठीची तरतूद विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे केली जाणार आहे. बांधकाम विभागाकडून या आणि अन्य रस्त्यांसाठी १७५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव वित्त विभागाला दिला जाणार आहे.