शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

राज्यात ४० टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: July 5, 2017 04:15 IST

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी २१ जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी २१ जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तसेच राज्यात ऊस वगळता खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र १३९.६४ लाख हेक्टर असून आतापर्यंत ५६.२१ लाख हेक्टर क्षेत्रावर (४० टक्के) पेरणी झाली आहे, असे राज्याच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यात खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे सुरू असून कोकण व कोल्हापूर विभागात भात पिकांची धुळवाफ पेरणी झाली आहे. खरीप पिकांच्या पेरणीस सुरूवात झाली असून पेरणी झालेल्या पिकांची उगवण समाधानकारक आहे. राज्यात १ जून ते ३० जून कालावधीचा सरासरी पाऊस २२३.३ मि.मी. असून तो सरासरीच्या ९७.९ टक्के पाऊस झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार राज्यात बहुतेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत २१ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त टक्के पाऊस झाला आहे. त्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड,लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. सरासरीच्या तुलनेत सिंधूदुर्ग, जळगाव, सांगली, अकोला, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला़येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.महाबळेश्वर १८, रत्नागिरी७, अलिबाग ३, पणजी ५, सातारा, सांगली ३, अमरावती ६, ब्रम्हपुरी १७, वर्धा ११ मिमी पावसाची नोंद झाली़