शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसची बदनामी करणा-यांचा लागला छडा, सायबर सेलकडे तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 16:02 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे. 

पुणे, दि. 12 - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे. नाशिकमधील एका संघटनेशी संबंधित असलेल्यांकडून करण्यात आला आहे, लवकरच संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.अंनिसच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापुरातून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभर जनचळवळ बनली आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणेशोत्सव मंडळांनीही गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा अभिनव पायंडा पाडला. यापार्श्वभूमीवर अंनिसची बदनामी करणारे मेसेज गणेश विसर्जनानंतर व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार दाखल केलीच. त्याचबरोबर स्वत: त्या मेसेजचा माग घेत शोधून काढले आहे.मिलिंद देशमुख यांनी सांगितले, गणेश विसर्जनामध्ये दान केलेल्या मूर्ती विक्री करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. त्यांना नागरिकांनी चोप दिला. तसेच त्यांच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे खोटे मेसेज व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करण्यात आले होते. मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच संबंधित पोलीस अधिका-याचे दिलेले नावही खोटे आहे. नागरिकांनी या खोटया पोस्टवर विश्वास ठेऊ नये, तसेच अफवांना बळी पडू नये. ही फेक न्यूज प्रसारीत करणा-यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.शासनाचे पाऊल योग्यपर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभागी न होण्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांना देण्यात आलेले परिपत्रक हे शासनाच्याच धोरणाच्या विरोधात होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित परिपत्रक रदद् केले. तसेच ते काढणा-या अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शासनाकडून उचलण्यात आलेले पाऊल अत्यंत योग्य आहे.