शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अंनिसची बदनामी करणा-यांचा लागला छडा, सायबर सेलकडे तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 16:02 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे. 

पुणे, दि. 12 - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे. नाशिकमधील एका संघटनेशी संबंधित असलेल्यांकडून करण्यात आला आहे, लवकरच संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.अंनिसच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापुरातून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभर जनचळवळ बनली आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणेशोत्सव मंडळांनीही गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा अभिनव पायंडा पाडला. यापार्श्वभूमीवर अंनिसची बदनामी करणारे मेसेज गणेश विसर्जनानंतर व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार दाखल केलीच. त्याचबरोबर स्वत: त्या मेसेजचा माग घेत शोधून काढले आहे.मिलिंद देशमुख यांनी सांगितले, गणेश विसर्जनामध्ये दान केलेल्या मूर्ती विक्री करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. त्यांना नागरिकांनी चोप दिला. तसेच त्यांच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे खोटे मेसेज व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करण्यात आले होते. मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच संबंधित पोलीस अधिका-याचे दिलेले नावही खोटे आहे. नागरिकांनी या खोटया पोस्टवर विश्वास ठेऊ नये, तसेच अफवांना बळी पडू नये. ही फेक न्यूज प्रसारीत करणा-यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.शासनाचे पाऊल योग्यपर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभागी न होण्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांना देण्यात आलेले परिपत्रक हे शासनाच्याच धोरणाच्या विरोधात होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित परिपत्रक रदद् केले. तसेच ते काढणा-या अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शासनाकडून उचलण्यात आलेले पाऊल अत्यंत योग्य आहे.