शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

स्पर्धा परीक्षा : करिअरचा राजमाग

By admin | Updated: January 15, 2017 01:20 IST

शहरी भागातील विद्यार्थी व पालकवर्गात स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, तसेच खासगी मंदी व स्पर्धा परीक्षेत यश

- प्रा. राजेंद्र चिंचोर्लेशहरी भागातील विद्यार्थी व पालकवर्गात स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, तसेच खासगी मंदी व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, यामुळे स्पर्धा परीक्षा हाच करिअरचा खरा राजमार्ग ठरत आहे.स्पर्धा परीक्षांचा उद्देश प्रशासकीय कामकाजासाठी चांगले अधिकारी व कर्मचारी निवडणे हा आहे. या परीक्षांद्वारे सर्वांना आपली गुणवत्ता, आपले कौशल्य, आपले व्यक्तिमत्त्व दाखविण्याची संधी असते. स्पर्धा परीक्षांमुळे गुणवत्तेला वाव मिळून चांगले अधिकारी, कर्मचारी निवडले जातात. नजीकच्या काळात कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा अपरिहार्य असणार आहेत.स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुलांचा सहभाग व यश हा चिंतेचा विषय आहे. स्पर्धा परीक्षांबद्दल अज्ञान, माहिती व मार्गदर्शनाचा अभाव, संदर्भ साहित्याचा अभाव, करिअरबद्दलची उदासीनता, जोश, जोम व नियोजनाचा अभाव या कारणांमुळे ग्रामीण भागाील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी उदासीनता आढळते.शिपायापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या पदांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. केंद्रीय पातळीवरील कर्मचारी व अधिकारी निवडीकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन), बँक भरती मंडळे, रेल्वे भरती मंडळे यांच्यामार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्रातील राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी निवडीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विभागीय निवड समिती, जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.विद्यापीठ परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांच्यात मोठा फरक आहे. विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी मिळते, तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळते. विद्यापीठ परीक्षा या एकरेषीय, तर स्पर्धा परीक्षा या बहुरेषीय असतात. विद्यापीठ परीक्षेचा कल हा विषय ज्ञान तपासणे हा असतो, तर स्पर्धा परीक्षेचा कल हा सामान्यज्ञान तपासणे हा असतो. विद्यापीठ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त, तर स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण (निवड) होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असते. विद्यापीठ परीक्षेत एकाच विषयाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते, तर स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व प्रकारच्या पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते.स्पर्धा परीक्षा हे साधन असून, अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे. सरकारी अधिकारी बनून स्थिर व आव्हानात्मक करिअरच्या माध्यमातून देशाची व समाजाची प्रामाणिकपणे आणि परिणामकारक सेवा करता येते. समाजात मान, सन्मान, आदर, कीर्ती प्राप्त होते.स्पर्धा परीक्षेत परिश्रम, सूत्रबद्ध, सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली आहे. अत्यंत विपरीत शिक्षण घेतलेले वरुण बरनवाल, नितीन जावळे, डॉ. राजेंद्र भारुड, संजय आखाडे, गोकूळ मवारे, बालाजी मंजुळे, रमेश घोलप, अंसार शेख, नितीन राजपूत, गोविंद जयस्वाल, दीपककुमार यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून, आयएएस पदावर विराजमान झाले आहेत.स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आपल्यातील क्षमता व मर्यादा ओळखाव्यात. ध्येय निश्चित करावे. मोठी स्वप्ने पाहावी. जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्न यांची जोड दिल्यास, करिअरचे यशोशिखर गाठता येणे सहज शक्य आहे.