शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा : करिअरचा राजमाग

By admin | Updated: January 15, 2017 01:20 IST

शहरी भागातील विद्यार्थी व पालकवर्गात स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, तसेच खासगी मंदी व स्पर्धा परीक्षेत यश

- प्रा. राजेंद्र चिंचोर्लेशहरी भागातील विद्यार्थी व पालकवर्गात स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, तसेच खासगी मंदी व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, यामुळे स्पर्धा परीक्षा हाच करिअरचा खरा राजमार्ग ठरत आहे.स्पर्धा परीक्षांचा उद्देश प्रशासकीय कामकाजासाठी चांगले अधिकारी व कर्मचारी निवडणे हा आहे. या परीक्षांद्वारे सर्वांना आपली गुणवत्ता, आपले कौशल्य, आपले व्यक्तिमत्त्व दाखविण्याची संधी असते. स्पर्धा परीक्षांमुळे गुणवत्तेला वाव मिळून चांगले अधिकारी, कर्मचारी निवडले जातात. नजीकच्या काळात कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा अपरिहार्य असणार आहेत.स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुलांचा सहभाग व यश हा चिंतेचा विषय आहे. स्पर्धा परीक्षांबद्दल अज्ञान, माहिती व मार्गदर्शनाचा अभाव, संदर्भ साहित्याचा अभाव, करिअरबद्दलची उदासीनता, जोश, जोम व नियोजनाचा अभाव या कारणांमुळे ग्रामीण भागाील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी उदासीनता आढळते.शिपायापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या पदांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. केंद्रीय पातळीवरील कर्मचारी व अधिकारी निवडीकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन), बँक भरती मंडळे, रेल्वे भरती मंडळे यांच्यामार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्रातील राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी निवडीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विभागीय निवड समिती, जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.विद्यापीठ परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांच्यात मोठा फरक आहे. विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी मिळते, तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळते. विद्यापीठ परीक्षा या एकरेषीय, तर स्पर्धा परीक्षा या बहुरेषीय असतात. विद्यापीठ परीक्षेचा कल हा विषय ज्ञान तपासणे हा असतो, तर स्पर्धा परीक्षेचा कल हा सामान्यज्ञान तपासणे हा असतो. विद्यापीठ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त, तर स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण (निवड) होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असते. विद्यापीठ परीक्षेत एकाच विषयाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते, तर स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व प्रकारच्या पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते.स्पर्धा परीक्षा हे साधन असून, अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे. सरकारी अधिकारी बनून स्थिर व आव्हानात्मक करिअरच्या माध्यमातून देशाची व समाजाची प्रामाणिकपणे आणि परिणामकारक सेवा करता येते. समाजात मान, सन्मान, आदर, कीर्ती प्राप्त होते.स्पर्धा परीक्षेत परिश्रम, सूत्रबद्ध, सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली आहे. अत्यंत विपरीत शिक्षण घेतलेले वरुण बरनवाल, नितीन जावळे, डॉ. राजेंद्र भारुड, संजय आखाडे, गोकूळ मवारे, बालाजी मंजुळे, रमेश घोलप, अंसार शेख, नितीन राजपूत, गोविंद जयस्वाल, दीपककुमार यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून, आयएएस पदावर विराजमान झाले आहेत.स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आपल्यातील क्षमता व मर्यादा ओळखाव्यात. ध्येय निश्चित करावे. मोठी स्वप्ने पाहावी. जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्न यांची जोड दिल्यास, करिअरचे यशोशिखर गाठता येणे सहज शक्य आहे.