शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पीक विम्याच्या नावानं कंपनीचं ‘चांगभलं’

By admin | Updated: July 4, 2014 01:06 IST

पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कृषी विभागही पीक विम्यासाठी आग्रही असतो. नापिकी होवूनही शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाही. २०१३ चा खरीप हंगाम

शेतकरी वाऱ्यावर : प्रिमीयम कोट्यवधींचे अन् लाभ मात्र तोकडा संतोष अरसोड - यवतमाळ पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कृषी विभागही पीक विम्यासाठी आग्रही असतो. नापिकी होवूनही शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाही. २०१३ चा खरीप हंगाम पुरता उद्ध्वस्त होवूनही पीक विमा कंपन्या पावसासारख्याच गायब झाल्या आहेत. यामुळे आता विमा काढणाऱ्या कंपन्यांवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे.गेल्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यावर नुकसान झाले. चार हजार ६४६ हेक्टरवरील जमीन खरडून गेली. आणेवारीसुध्दा पन्नास टक्केच्या आत आली. दुबार-तिबार पेरणीने शेतकरी आर्थिक चकव्युहात सापडले. त्यानंतर रबी हंगामात गारपिटीने एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट केलीत. खरीप हंगामात विमा काढलेल्या शेतकऱ्यांना एवढ्या भीषण स्थितीतही विमा मिळण्याची चिन्हे दिसत नसून लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत. कापूस, सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांकरीता अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडियाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा काढण्याची सक्ती करण्यात येते. मात्र भरपाई ठरविण्याची पध्दत किचकट असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक संरक्षण कमी आणि कंपन्यांचे जादा असा प्रकार होत आहे. विमा काढूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नसल्यामुळे या कंपन्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नावाखाली कंपनीने कोट्यवधी रूपयाने गंडा घातल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येते. विमा काढणाऱ्या कंपनीवर कुणाचेही नियंत्रण नसते. गेल्या तीन वर्षात ७० ते ८० टक्के पेक्षा कमी उत्पादन झालेल्या संपूर्ण मंडळातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ घेता येईल, ही अटही जीवघेणी आहे. पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांनाही रक्कम भरावीच लागते. खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ८९१ सभासदांनी पीक विम्यापोटी कंपनीकडे सहा कोटी ९६ लाख १९ हजार रूपये जमा केलेत. त्या हंगामात जिल्हयातील शेती नैसर्गिक प्रकोपाने उद्ध्वस्त झाली.