शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

सामान्य माणूस पैशाअभावी मरता कामा नये; 'आयुष्मान भारत' राज्य समितीकडून रुग्णालयांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:11 IST

लोकप्रतिनिधी आणि शासनास जबाबदार ठरवले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होतेय असं त्यांनी पत्रात म्हटलं.

मुंबई - पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानं राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरून आयुष्मान भारत-मिशन महाराष्ट्र समितीकडून राज्यातील सर्व खासगी, शासकीय रुग्णालयांना पत्र पाठवण्यात आलं आहे. वैद्यकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्रासारखं पैसा कमावणे, अर्थकारण करणे व सामाजिक तत्त्वांचे उल्लंघन करत उपचारावर अमाप खर्च वसूल करणे झालंय हे दुर्दैव आहे. मात्र रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल अशी नोंद घ्यावी असं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रात म्हटलं आहे.

या पत्रात लिहिलंय की, रुग्णसेवा करता सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. रुग्ण आणि रुग्णालय दोन्हीही जिवंत राहून कार्य करता आले पाहिजे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत मिशन, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेद्वारे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांना लाभ देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचाराअभावी मरता कामा नये अशी सक्त सूचना दिल्याचं सांगितले आहे.

तसेच बऱ्याचदा गंभीर असलेला रुग्ण दाखल करून घेत असताना संबंधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज लिहून घेतला जातो, मला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. मुळात आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा असतानाही वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार सुरू आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना हीदेखील आयुष्मान योजनेद्वारे नियंत्रित केली जाते. अपघात झालेल्या रुग्णास पैसे न घेता तात्काळ उपचार करण्याची जबाबदारी रुग्णालयांवरती आहे. जिओ टॅगिंगचा अपघातग्रस्त रुग्णाचा एक फोटो आणि एफआयआर पाठवल्यावर योजनेतंर्गत निधी पाठवला जातो. त्यामुळे कोणतेही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतानाही अपघातग्रस्तावर तात्काळ उपचार करुन रुग्णाचे प्राण वाचवणे हे प्राधान्य ठरते अशी आठवण आयुष्मान भारत मिशनने रुग्णालयांना करून दिली आहे.

दरम्यान, राज्यात एकूण २०३१ धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे रुग्णास तातडीने भरती करून उपचार सुरू करावे. रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यास संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागेल. काही रुग्णालयांच्या गैरकृतीने राज्याच्या सामाजिक संतुलनावरती विपरीत परिणाम होत असून जनसामान्यांची आर्थिक पिळकवणूक केली जाते. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनास जबाबदार ठरवले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होतेय. त्यामुळे सदर चुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीकडून रुग्णालयांना कळवण्यात आले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल