शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य माणूस पैशाअभावी मरता कामा नये; 'आयुष्मान भारत' राज्य समितीकडून रुग्णालयांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:11 IST

लोकप्रतिनिधी आणि शासनास जबाबदार ठरवले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होतेय असं त्यांनी पत्रात म्हटलं.

मुंबई - पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानं राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरून आयुष्मान भारत-मिशन महाराष्ट्र समितीकडून राज्यातील सर्व खासगी, शासकीय रुग्णालयांना पत्र पाठवण्यात आलं आहे. वैद्यकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्रासारखं पैसा कमावणे, अर्थकारण करणे व सामाजिक तत्त्वांचे उल्लंघन करत उपचारावर अमाप खर्च वसूल करणे झालंय हे दुर्दैव आहे. मात्र रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल अशी नोंद घ्यावी असं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रात म्हटलं आहे.

या पत्रात लिहिलंय की, रुग्णसेवा करता सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. रुग्ण आणि रुग्णालय दोन्हीही जिवंत राहून कार्य करता आले पाहिजे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत मिशन, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेद्वारे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांना लाभ देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचाराअभावी मरता कामा नये अशी सक्त सूचना दिल्याचं सांगितले आहे.

तसेच बऱ्याचदा गंभीर असलेला रुग्ण दाखल करून घेत असताना संबंधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज लिहून घेतला जातो, मला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. मुळात आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा असतानाही वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार सुरू आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना हीदेखील आयुष्मान योजनेद्वारे नियंत्रित केली जाते. अपघात झालेल्या रुग्णास पैसे न घेता तात्काळ उपचार करण्याची जबाबदारी रुग्णालयांवरती आहे. जिओ टॅगिंगचा अपघातग्रस्त रुग्णाचा एक फोटो आणि एफआयआर पाठवल्यावर योजनेतंर्गत निधी पाठवला जातो. त्यामुळे कोणतेही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतानाही अपघातग्रस्तावर तात्काळ उपचार करुन रुग्णाचे प्राण वाचवणे हे प्राधान्य ठरते अशी आठवण आयुष्मान भारत मिशनने रुग्णालयांना करून दिली आहे.

दरम्यान, राज्यात एकूण २०३१ धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे रुग्णास तातडीने भरती करून उपचार सुरू करावे. रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यास संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागेल. काही रुग्णालयांच्या गैरकृतीने राज्याच्या सामाजिक संतुलनावरती विपरीत परिणाम होत असून जनसामान्यांची आर्थिक पिळकवणूक केली जाते. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनास जबाबदार ठरवले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होतेय. त्यामुळे सदर चुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीकडून रुग्णालयांना कळवण्यात आले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल