शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

सामान्य माणूस पैशाअभावी मरता कामा नये; 'आयुष्मान भारत' राज्य समितीकडून रुग्णालयांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:11 IST

लोकप्रतिनिधी आणि शासनास जबाबदार ठरवले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होतेय असं त्यांनी पत्रात म्हटलं.

मुंबई - पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानं राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरून आयुष्मान भारत-मिशन महाराष्ट्र समितीकडून राज्यातील सर्व खासगी, शासकीय रुग्णालयांना पत्र पाठवण्यात आलं आहे. वैद्यकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्रासारखं पैसा कमावणे, अर्थकारण करणे व सामाजिक तत्त्वांचे उल्लंघन करत उपचारावर अमाप खर्च वसूल करणे झालंय हे दुर्दैव आहे. मात्र रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल अशी नोंद घ्यावी असं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रात म्हटलं आहे.

या पत्रात लिहिलंय की, रुग्णसेवा करता सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. रुग्ण आणि रुग्णालय दोन्हीही जिवंत राहून कार्य करता आले पाहिजे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत मिशन, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेद्वारे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांना लाभ देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचाराअभावी मरता कामा नये अशी सक्त सूचना दिल्याचं सांगितले आहे.

तसेच बऱ्याचदा गंभीर असलेला रुग्ण दाखल करून घेत असताना संबंधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज लिहून घेतला जातो, मला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. मुळात आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा असतानाही वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार सुरू आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना हीदेखील आयुष्मान योजनेद्वारे नियंत्रित केली जाते. अपघात झालेल्या रुग्णास पैसे न घेता तात्काळ उपचार करण्याची जबाबदारी रुग्णालयांवरती आहे. जिओ टॅगिंगचा अपघातग्रस्त रुग्णाचा एक फोटो आणि एफआयआर पाठवल्यावर योजनेतंर्गत निधी पाठवला जातो. त्यामुळे कोणतेही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतानाही अपघातग्रस्तावर तात्काळ उपचार करुन रुग्णाचे प्राण वाचवणे हे प्राधान्य ठरते अशी आठवण आयुष्मान भारत मिशनने रुग्णालयांना करून दिली आहे.

दरम्यान, राज्यात एकूण २०३१ धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे रुग्णास तातडीने भरती करून उपचार सुरू करावे. रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यास संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागेल. काही रुग्णालयांच्या गैरकृतीने राज्याच्या सामाजिक संतुलनावरती विपरीत परिणाम होत असून जनसामान्यांची आर्थिक पिळकवणूक केली जाते. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनास जबाबदार ठरवले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होतेय. त्यामुळे सदर चुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीकडून रुग्णालयांना कळवण्यात आले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल