शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर समित्यांचा उतारा!

By admin | Updated: January 5, 2016 03:10 IST

राज्यात सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आणि तालुका आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

मुंबई : राज्यात सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आणि तालुका आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.ज्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे तेथील गाव पातळीवरील समितीचे अध्यक्षपद हे स्थानिक सरपंचांकडे असेल. समितीमध्ये ग्रामसेवक, प्रगतीशील शेतकरी, सहकारी पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष, दोन अल्पभूधारक शेतकरी, कृषी सहाय्यक हे सदस्य असतील. तर तलाठी हे सदस्य सचिव असतील. तालुकास्तरीय दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्षपद हे शासन नियुक्त अशासकीय सदस्याकडे असेल. गट विकास अधिकारी, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, एक प्रगतीशील शेतकरी, दोन अल्पभूधारक शेतकरी हे सदस्य तर तहसीलदार हे सदस्य सचिव असतील. जिल्हा पातळीवरील दुष्काळ निवारण समितीच्या अध्यक्षपदी पालक मंत्री/विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा वा राज्यसभा सदस्य यापैकी एकाची नियुक्ती राज्य शासन करेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी (नरेगा), वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा कृषी अधीक्षक, पशुसंवर्धन अधिकारी आणि प्रत्येकी एक प्रगतीशील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी तसेच एनजीओंचे तीन प्रतिनिधी या समितीचे सदस्य असतील. जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील. टंचाई असलेल्या गावांमध्ये/ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे की नाही, टँकरच्या फेऱ्या, टँकर पूर्ण भरलेले आहेत की नाही याची पाहणी करणे, रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची खात्री करणे, जनावरांच्या चारा छावण्यांची पाहणी, जनावरांची संख्या, छावण्यांमधील सोयी, आपद्ग्रस्तांना वेळेत मदत मिळते की नाही, शासकीय योजनांच्या लाभार्र्थींपर्यंत लाभ पोहोचतो की नाही यावर नजर ठेवण्याचे काम गाव पातळीवरील समिती करेल.शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांची गावांमध्ये अंमलबजावणी झाली आहे की नाही, किती शेतकऱ्यांचा शेतसारा माफ झाला, किती परीक्षा शुल्क माफ झाले, वीज बिलात किती सूट मिळाली, प्रत्यक्ष लाभार्र्थींना लाभ झाला की नाही या बाबतचा आढावा, नियोजन आणि नियंत्रण व अंमलबजावणी करण्याचे अधिकार तालुका समितीला असतील.दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी गावांमध्ये झाली की नाही, शेतकऱ्यांचा शेतसारा माफ झाला आहे का, परीक्षा शुल्क किती माफ झाले, पीक विमा, पीक कर्ज, कर्जावरील व्याज माफी, सावकारांचे कर्ज, जनावरांच्या छावण्या आदींबाबत संपूर्ण जिल्ह्णाचा आढावा, नियोजन, नियंत्रण व अंमलबजावणीचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला असतील. (विशेष प्रतिनिधी)