शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

समित्यांतील आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 05:38 IST

शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनामधून बाद केल्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकवरही झाला आहे

मुंबई/नवी मुंबई : शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनामधून बाद केल्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकवरही झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. तर दुसरीकडे मुंबई बाजार समितीत एका दिवसामध्ये तब्बल २१४३ टन आवक कमी झाली. रद्द केलेल्या नोटा घेण्यावरून काही वेळ संभ्रम निर्माण झाला होता. भाजी व फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उधारीवर व्यवहार करण्यात आले. तर दुसरीकडे ५०० व हजाररुपयांच्या नोटा घ्यायच्या की नाही याविषयी स्पष्ट माहिती नसल्यामुळे एपीएमसीमध्ये गोंधळ झाला होता.बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केटमधील व्यवहार पहाटे सुरू होत असतात. ग्राहकांनी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा आणल्यामुळे सुरुवातीला व्यापाऱ्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. पण व्यवहार ठप्प होत असल्यामुळे अखेर पैसे स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. जे खरेदीदार वर्षानुवर्षे मार्केटमध्ये येत आहेत त्यांना उधारीवर माल देण्यात आला. मार्केटमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनीही माल कमी प्रमाणात विक्रीसाठी पाठविला होता. ८ नोव्हेंबरला १३३२ टन भाजीपाला विक्रीला आला होता, पण बुधवारी १२१५ टनच माल आला होता. फळ, कांदा, धान्य व मसाला मार्केटमध्येही आवक कमी झाली आहे. कांदा - बटाटा मार्केटमध्ये बाजारभाव थोड्या प्रमाणात वाढला तरी इतर मार्केटमध्ये मात्र भाव जैसे थे होते. खान्देशातील उलाढाल ठप्पजळगाव/धुळे/नंदुरबार : बुधवारी खान्देशातील बाजार समित्यांमध्ये कामकाज झाले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जळगाव बाजार समितीत नाफेडतर्फे उडीद खरेदी सुरु झाली. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री, शिरपूर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. धुळे बाजार समिती दोन दिवस बंद राहणार आहे.‘केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारी’पारनेर (अहमदनगर): केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाचशे व एक हजाराच्या चलनातील नोटा बंद केल्याचा निर्णय क्रांतिकारी व स्वागतार्ह आहे. त्यामुळे काळा पैसा बाहेर येईलच शिवाय भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीव्यक्त केला.अण्णांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. अण्णा हजारे यांनी या नोटा बंद करण्याचा सातत्याने आग्रह धरला होता. राळेगणसिध्दीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. दहशतवादी हा पैसा वापरत असतील तर त्यांनाही चांगलीच चपराक बसेल. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. अचानक हा निर्णय जाहीर केला, ही चांगली बाब असल्याचे अण्णा म्हणाले. आता राजकीय पक्षांना वीस हजारांपेक्षा अधिकच्या देणग्या जाहीर करणे बंधनकारक करावे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांचा खर्च व देणग्यांचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणीही अण्णांनी केली. पंढरीत आलेल्या वारकऱ्यांपुढेही पेच!सचिन कांबळे, पंढरपूरपाचशे-हजाराची नोट कनवटीला खोचून भूवैकुंठी पंढरपूरात कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भक्तांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून परतायचे म्हटले तरी भाडेखर्चाचा प्रश्न कसा सोडवायचा, अशा विवंचनेत अनेक वारकरी असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. पंढरपूरात शुक्रवारी कार्तिकी यात्रा आहे. त्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. त्यांनी पंढरपुरातील लॉज किंवा धर्मशाळेत मुक्काम ठोकला आहे. परंतु अचानक हा निर्णय झाल्याने चालणारे चलन कुठून आणायचे, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे. हॉटेल, लॉज, भक्तनिवास, खेळणी, गाड्या, प्रसाद साहित्य व विविध वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी रात्रीपासूनच ५०० व हजाराच्या नोट्या घेण्याचे बंद केले आहे. यामुळे अनेकांना सकाळचा चहाही घेता आला नाही. पंढरपुरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकानात ‘५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद’ असे फलक लावल्याने अनेक ठिकाणी सुट्या पैशावरून वारकऱ्यांशी वाद झाले. आम्ही २२ जण कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी सहकुटुंब आलो आहोत. परंतु काल रात्रीपासून ५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. गावी परत जायचे म्हटले तरी भाडेखर्चाची तजवीज करावी लागणार.- प्रशांत मेरस, वारकरी,(रा. साखरखेरडा, जि. बुलडाणा)

देणगीवरही परिणामया निर्णयामुळे विठ्ठल-रखुमाई मंदिरात येणाऱ्या देणग्यांवरही परिणाम झाला आहे. देणगी स्वीकारण्यास पुणे येथील विठ्ठल सेवा मंडळाचे १२० स्वयंसेवक दाखल झाले होते़ ते मंदिरासह परिसरात स्टॉलच्या माध्यमातून देणगी स्वीकारत आहेत़ मात्र ५०० व १००० रुपयांची नोट घेऊन उर्वरित पैसे देण्यास स्वयंसेवकांकडून असमर्थता व्यक्त केली जात होती.