शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

नियमनमुक्तीचा पेच सोडविण्यासाठी समिती नेमणार

By admin | Updated: July 22, 2016 04:21 IST

भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार

मुंबई : भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीत सरकार, प्रशासन, शेतकरी, व्यापारी, माथाडी आणि बाजार समित्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. येत्या ६ आॅगस्टपर्यंत ही समिती राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले. नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे व्यापा-यांनी पुकारलेला बंद आणि माथाडी कामगारांमधील नाराजीबाबत राष्ट्रवादीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. नियमनमुक्तीचा निर्णय घेताना राज्य सरकारने कृषी उत्तन्न बाजार समित्यांमधील व्यापा-यांवर बंधने घातली. मात्र, अन्य व्यापारी उद्योगपतींना सूट मिळाली. राज्यात सुमारे साडेतीनशेहून अधिक कृषी उत्तन्न बाजार समित्या आहेत. या समित्यांमधील व्यापारी कायद्याच्या चौकटीत व्यापार करतात. त्यामुळे सरकारने व्यापा-यांचेही हित सांभाळणे अपेक्षित आहे. नियमनमुक्तीबाबत सरकारने चर्चेद्वारे योग्य धोरण ठरवावे. यासंदर्भात राज्य सरकारने समिती नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही ही समिती नियुक्त झालेली नाही. तसेच व्यापा-यांच्या संपकाळात बंद केलेले चेकनाके पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी आ. पाटील यांनी यावेळी केली. यावर माथाडी, व्यापारी आदींच्या मागणीनुसार राज्य सरकारने पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.