शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नियमनमुक्तीचा पेच सोडविण्यासाठी समिती नेमणार

By admin | Updated: July 22, 2016 04:21 IST

भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार

मुंबई : भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीत सरकार, प्रशासन, शेतकरी, व्यापारी, माथाडी आणि बाजार समित्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. येत्या ६ आॅगस्टपर्यंत ही समिती राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले. नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे व्यापा-यांनी पुकारलेला बंद आणि माथाडी कामगारांमधील नाराजीबाबत राष्ट्रवादीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. नियमनमुक्तीचा निर्णय घेताना राज्य सरकारने कृषी उत्तन्न बाजार समित्यांमधील व्यापा-यांवर बंधने घातली. मात्र, अन्य व्यापारी उद्योगपतींना सूट मिळाली. राज्यात सुमारे साडेतीनशेहून अधिक कृषी उत्तन्न बाजार समित्या आहेत. या समित्यांमधील व्यापारी कायद्याच्या चौकटीत व्यापार करतात. त्यामुळे सरकारने व्यापा-यांचेही हित सांभाळणे अपेक्षित आहे. नियमनमुक्तीबाबत सरकारने चर्चेद्वारे योग्य धोरण ठरवावे. यासंदर्भात राज्य सरकारने समिती नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही ही समिती नियुक्त झालेली नाही. तसेच व्यापा-यांच्या संपकाळात बंद केलेले चेकनाके पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी आ. पाटील यांनी यावेळी केली. यावर माथाडी, व्यापारी आदींच्या मागणीनुसार राज्य सरकारने पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.