शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

इंदू मिल स्मारकासाठी समिती

By admin | Updated: March 24, 2016 01:43 IST

दू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्यावर मतैक्य घडविण्यासाठी सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांशी चर्चा करुन आराखडा

मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्यावर मतैक्य घडविण्यासाठी सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांशी चर्चा करुन आराखडा अंतिम करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तसेच, येत्या १४ एप्रिलनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी अद्याप इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत झाली नाही. त्यामुळे स्मारकाच्या बांधकामात प्रगती होत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथील स्मारकाच्या उभारणीसाठी सर्व आवश्यक परवानग्या केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत. जागेचे हस्तांतरण ही केवळ तांत्रिक बाब असून प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याची लेखी परवानगी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने दिली आहे. तसेच १४ एप्रिलला मोठ्या प्रमाणावर लोक चैत्यभूमी आणि इंदू मिलला येतात. यावेळी मिलच्या जागेत तोडफोड आणि काम सुरु असेल तर लोकांना त्रास होईल अशी भूमिका अनेकांनी मांडली. त्यामुळे १४ एप्रिलनंतरच या कामाला सुरुवात केली जाईल. स्मारकाच्या सध्याच्या आराखड्यावर काहीजणांनी आक्षेप घेतले आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत कोणताच वाद राहू नये, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आराखड्याबाबत सर्वांचे मतैक्य घडविण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांची एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. स्मारकाच्या विकासासाठी शासनाने यापूर्वीच एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने स्मारकासाठी १२५ कोटींची तरतूद आपल्या अर्थसंकल्पात केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. स्मारक कधीपर्यंत बांधून पूर्ण होणार, असा प्रश्न भाई गिरकर यांनी विचारला तर स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी सरकारने कोणती व्यवस्था केली आहे का, असा प्रश्न हेमंत टकले यांनी विचारला. यावर, एमएमआरडीएकडे स्मारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. भविष्यात स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याचा सरकारचा विचार आहे. (प्रतिनिधी)स्मारकाचा आराखडा निश्चित झाल्यानंतर स्मारकाच्या निर्मितीबाबत तारीखवार तपशील जाहीर करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.