शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग हवा

By admin | Updated: February 5, 2015 01:12 IST

कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

उमेश चौबे : ‘आक्रोश’ सभेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला धीरनागपूर : कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी केले. गंगाजमुनातील वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे येथील महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईचा निषेध म्हणून बुधवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी माजी खासदार जांबुवंतराव धोटे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री युवराज निकोसे, माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब कंगाले, माजी पोलीस अधिकारी हरीसिंग साबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नूतन रेवतकर, डॉ. नयना धवड, अरुणा सबाने, दीपक निलावार, मधुकर कुकडे, सुनील चाखोरे, उत्तमबाबा सेनापती हे प्रामुख्याने उपस्थित होते.संविधानानुसार प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे वारांगना कुठलेही बेकायदेशीर काम करत नाही. परंतु ‘पीटा’ नियमांतील अटींचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे, असे मत बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केले. वारांगनांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील या शब्दांत साबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वारांगनांना परवाने देण्यात यावे तसेच त्यांना पेन्शन देखील असावी. वारांगनांच्या कुटुंबांना सरकारने पोसायला हवे, अशी मागणी डॉ.धवड यांनी केली. यावेळी जांबुवंतराव धोटे, नूतन रेवतकर, अरुणा सबाने यांनीदेखील वारांगनांच्या समर्थनार्थ भाषण केले. सभेचे संचालन नरेंद्र पालांदूरकर यांनी केले. यावेळी सुमारे ४०० वारांगना सभागृहात एकत्र आल्या होत्या. (प्रतिनिधी)सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शनेदरम्यान, आक्रोश सभेनंतर झाशी राणी चौकात सामाजिक कार्यकर्ते व वारांगना एकत्र झाले व तेथे छोटेखानी सभा घेण्यात आली. नंतर व्हेरायटी चौकात सर्व जण एकत्र आले व सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.