शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग हवा

By admin | Updated: February 5, 2015 01:12 IST

कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

उमेश चौबे : ‘आक्रोश’ सभेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला धीरनागपूर : कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी केले. गंगाजमुनातील वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे येथील महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईचा निषेध म्हणून बुधवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी माजी खासदार जांबुवंतराव धोटे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री युवराज निकोसे, माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब कंगाले, माजी पोलीस अधिकारी हरीसिंग साबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नूतन रेवतकर, डॉ. नयना धवड, अरुणा सबाने, दीपक निलावार, मधुकर कुकडे, सुनील चाखोरे, उत्तमबाबा सेनापती हे प्रामुख्याने उपस्थित होते.संविधानानुसार प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे वारांगना कुठलेही बेकायदेशीर काम करत नाही. परंतु ‘पीटा’ नियमांतील अटींचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे, असे मत बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केले. वारांगनांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील या शब्दांत साबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वारांगनांना परवाने देण्यात यावे तसेच त्यांना पेन्शन देखील असावी. वारांगनांच्या कुटुंबांना सरकारने पोसायला हवे, अशी मागणी डॉ.धवड यांनी केली. यावेळी जांबुवंतराव धोटे, नूतन रेवतकर, अरुणा सबाने यांनीदेखील वारांगनांच्या समर्थनार्थ भाषण केले. सभेचे संचालन नरेंद्र पालांदूरकर यांनी केले. यावेळी सुमारे ४०० वारांगना सभागृहात एकत्र आल्या होत्या. (प्रतिनिधी)सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शनेदरम्यान, आक्रोश सभेनंतर झाशी राणी चौकात सामाजिक कार्यकर्ते व वारांगना एकत्र झाले व तेथे छोटेखानी सभा घेण्यात आली. नंतर व्हेरायटी चौकात सर्व जण एकत्र आले व सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.