शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग हवा

By admin | Updated: February 5, 2015 01:12 IST

कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

उमेश चौबे : ‘आक्रोश’ सभेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला धीरनागपूर : कुठलीही महिला स्वत:च्या मर्जीने नव्हे तर परिस्थितीमुळे वारांगना बनते. या वारांगनांचा व्यवसाय जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. वारांगनांच्या पुनर्वसनासाठी आयोग स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी केले. गंगाजमुनातील वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे येथील महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईचा निषेध म्हणून बुधवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी माजी खासदार जांबुवंतराव धोटे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री युवराज निकोसे, माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब कंगाले, माजी पोलीस अधिकारी हरीसिंग साबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नूतन रेवतकर, डॉ. नयना धवड, अरुणा सबाने, दीपक निलावार, मधुकर कुकडे, सुनील चाखोरे, उत्तमबाबा सेनापती हे प्रामुख्याने उपस्थित होते.संविधानानुसार प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे वारांगना कुठलेही बेकायदेशीर काम करत नाही. परंतु ‘पीटा’ नियमांतील अटींचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे, असे मत बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केले. वारांगनांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील या शब्दांत साबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वारांगनांना परवाने देण्यात यावे तसेच त्यांना पेन्शन देखील असावी. वारांगनांच्या कुटुंबांना सरकारने पोसायला हवे, अशी मागणी डॉ.धवड यांनी केली. यावेळी जांबुवंतराव धोटे, नूतन रेवतकर, अरुणा सबाने यांनीदेखील वारांगनांच्या समर्थनार्थ भाषण केले. सभेचे संचालन नरेंद्र पालांदूरकर यांनी केले. यावेळी सुमारे ४०० वारांगना सभागृहात एकत्र आल्या होत्या. (प्रतिनिधी)सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शनेदरम्यान, आक्रोश सभेनंतर झाशी राणी चौकात सामाजिक कार्यकर्ते व वारांगना एकत्र झाले व तेथे छोटेखानी सभा घेण्यात आली. नंतर व्हेरायटी चौकात सर्व जण एकत्र आले व सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.