शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पाकिस्तानी नागरिकाला देश सोडण्याचा आदेश

By admin | Updated: February 10, 2017 04:50 IST

२००७ मध्ये देशामधून बाहेर पाठवलेला पाकिस्तानी नागरिक वसीम-उर-रेहमान शहा पुन्हा देशात परतल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला.

मुंबई : २००७ मध्ये देशामधून बाहेर पाठवलेला पाकिस्तानी नागरिक वसीम-उर-रेहमान शहा पुन्हा देशात परतल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर तो देशात दिसल्यास पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.पाकिस्तानच्या वसीम-उर-रेहमान शहाला २००७ मध्ये भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात आले. मात्र २०१० मध्ये त्याने पुन्हा देशात प्रवेश मिळवला. नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याने केंद्र सरकारने त्याला देश सोडण्याचा आदेश दिला. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली. आता पुन्हा मुदत संपल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. आजोबा मूळचे भारतीय असल्याने आपल्यालाही भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. भारताचे नागरिकत्व मिळेपर्यंत आपल्याला भारतात राहण्याची परवानगी द्यावी व पोलिसांना आपल्याविरुद्ध कारवाई न करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी वसीम याने केली आहे.मात्र केंद्र सरकारने वसीमचे आजोबा भारतीय असले तरी तो भारतीय नसल्याने त्याला भारताचे नागरिकत्व देण्यास नकार दिल्याचे खंडपीठाला सांगितले. कायद्यांतर्गत आवश्यक असलेल्या बाबी वसीम याने पूर्ण न केल्याने सरकारने त्याला नागरिकत्व दिलेले नाही, असे केंद्र सरकारने खंडपीठाला सांगितले.उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत वसीम याला भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्याला दहा दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला. दरम्यानच्या काळात त्याला दररोज भांडुप पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे निर्देश दिले. वसीम याच्याबरोबर त्याची पत्नीही असल्याने तिलाही देश सोडावा लागणार आहे. वसीमचे आजोबा सुफी संत असल्याने त्यांची जागा चालवण्यासाठी तो इथे आल्याचे त्याने याचिकेत म्हटले आहे. ‘माझ्या आजोबांनी येथे अनेक दर्गे बांधले. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात मला वारसदार केले आहे. त्यामुळे त्यांचे काम पुढे चालवण्यासाठी मला भारताचे नागरिकत्व द्यावे,’ असे वसीम याने याचिकेत म्हटले आहे.तर त्याच्या याचिकेत मध्यस्थी करणाऱ्या अर्जदाराने वसीम दर्ग्यांमधून भारतविरोधी भाषणे देऊन लोकांना चिथावत असल्याचे खंडपीठाला सांगितले. वसीम दर्ग्यांची जागा बळकावण्यासाठी येथे आला आहे. येथील दर्ग्यांच्या कामात व्यत्यय आणत आहे. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मध्यस्थी अर्जदाराने अर्जात नमूद केले आहे.२०१२ मध्ये वसीम राज्य सरकारच्या परवानगीशिवाय लाल दिव्याची गाडी घेऊन फिरत असल्याने चांगलाच चर्चेत आला होता. उच्च न्यायालयाने त्या वेळीही त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. (प्रतिनिधी)