शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

आधी दिलासा, मग शॉक!

By admin | Updated: February 19, 2015 02:15 IST

राज्यातील औद्योगिक ग्राहकांवरील वीजदराचा भार कमी करण्यासाठी महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सरासरी ८ टक्के दरवाढीचा ४ हजार ७१७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे.

मुंबई : राज्यातील औद्योगिक ग्राहकांवरील वीजदराचा भार कमी करण्यासाठी महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सरासरी ८ टक्के दरवाढीचा ४ हजार ७१७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात महसुलात होणारी तूट भरून काढण्यासाठी दरवाढीचा भार सामान्य वीज ग्राहकांंवर टाकण्यात आला आहे. आणि महावितरणने दाखल केलेला जर आयोगाने मंजुर केला, तर मात्र घरगुती वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला असला तरी मार्च महिन्यात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांचे दर कमी होणार आहेत. वसुलीची मुदत संपल्याने महानिर्मितीच्या दरापोटी लागू असलेली आणि अंतरिम आकाराची रक्कम मार्च महिन्याच्या बीलात लागू होणार नाही. त्यामुळे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीज बिलात दिलासा मिळणार आहे. एकूणच आधी दिलासा नंतर शॉक देण्याच्या या पद्धतीने वीज ग्राहक मात्र चांगलेच वैतागणार आहेत. राज्य सरकारने औद्योगिक वीज ग्राहकांना देण्यात येणारे अनुदान बंद केल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी औद्योगिक वीज दर वाढीव राहिल्यास राज्यातील उद्योग राज्याबाहेर जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय औद्योगिक संघटनांना उद्योगांसाठी लागणाऱ्या वीजेचे दर कमी व्हावे, म्हणून आंदोलने छेडण्यात येत आहेत. मध्यंतरी वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना अनुदान न देता त्यांचे वीजदर कमी कसे करता येतील; याबाबतची योजना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाला सादर करण्यात येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते.परिणामी औद्योगिक ग्राहकांचे वीज दर कमी करण्याच्या उद्देशाने महावितरणने आयोगाकडे ८ टक्के दरवाढीचा ४७१७ कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल केला आहे. उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सरकारच्या भूमिकेनुसार औद्योगिक ग्राहकांच्या वीजदरात ५ टक्के आणि व्यापारी वीजदरात ३ टक्के कपात सुचविण्यात आली आहे. परंतू महसुलातील तूट भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा भार सामान्य घरगुती ग्राहकांवर टाकण्यात आला आहे. (प्रतिनिधी)च्वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला असला तरी मार्च महिन्यात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांचे दर कमी होणार आहेत.च्वसुलीची मुदत संपल्याने महानिर्मितीच्या दरापोटी लागू असलेली आणि अंतरिम आकाराची रक्कम मार्च महिन्याच्या बीलात लागू होणार नाही. त्यामुळे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीज बीलात दिलासा मिळणार आहे. च्सध्याच्या एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट दर रुपये ८.५९ ऐवजी ७.५९ आणि नॉन एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट दर रुपये ७.८२ ऐवजी ६.८८ रुपये हा दर लागू होईल.च्घरगुती ग्राहकांचे दरही कमी होणार असून, १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना प्रति युनिट ४.१६ रुपये ऐवजी ३.६५ रुपये आणि १०१ ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्यांना प्रति युनिट दर ७.३९ वरून ६.५४ रुपये होईल.च्वाणिज्यिक ग्राहकांनाही वीज बीलात प्रति युनिट ०.९२ ते १.६३ रुपये असा दिलासा मिळेल.च्एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळातील वीजदरासाठीचा हा प्रस्ताव आहे.च्प्रस्तावानुसार, दर महिन्याला ७५ युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात वाढ होणार नाही. मात्र त्यापुढील सर्व वीजग्राहकांना वीजेच्या दरवाढीला सामोरे जावे लागले.च्महावितरणच्या एकूण ग्राहकांपैकी दीड कोटी ग्राहक महिन्याला ३०० युनिटपर्यंतची वीज वापरणारे आहेत. आणि महावितरणचा हा वीज दरवाढीचा प्रस्ताव स्वीकारला तर सगळ्यात जास्त फटका या वर्गातील ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.च्प्रस्तावावर १८ मार्चपासून वाशी, अमरावती, नागपूर, औरगांबाद, नाशिक आणि पुणे येथे जनसुनावणी होईल. आणि त्यानंतर पुणे येथे १० एप्रिल रोजी अंतिम सुनावणी होईल.