शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

सोयी-सुविधा-सवलतींपासून नंदीवाले समाज दूरच

By admin | Updated: October 31, 2016 01:22 IST

आधुनिक काळात घराघरात पोहोचलेली करमणूक व्यवस्था यामुळे नंदीकडून भविष्य कोणी ऐकत नाही.

सतीश सांगळे, कळस : शिक्षणाच्या प्रचार व प्रसारामुळे वाढलेली विज्ञाननिष्ठा आणि आधुनिक काळात घराघरात पोहोचलेली करमणूक व्यवस्था यामुळे नंदीकडून भविष्य कोणी ऐकत नाही. त्यामुळे नंदीवाले समाजाचा भविष्य सांगण्याचा परंपरागत व्यवसाय लोप पावत आहे. गावकुसाबाहेर भटकंती करणारा हा समाज आता स्थिर होत आहे. शेती, शेतमजुरी करून उदरनिर्वाह केला जात आहे. मात्र, गावगाड्यातून आजही सोयी-सुविधा-सवलती व घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, अशी खंत काझड (ता. इंदापूर) येथील नंदीवालेवस्तीमधील नागरिकांनी व्यक्त केली. या ठिकाणी सुमारे १५ कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून राहत आहेत. ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ हे गाणं महाराष्ट्राला सुपरिचित आहे. गाण्यातला भोलानाथ म्हणजेच नंदीवाल्यांचा नंदी. शिंगांना व पायात रंगीत सुती गोंडे बांधलेले, गळ्यात घंटांची माळ आणि पाठीवर रंगीबेरंगी व सुंदर नक्षीकाम केलेली शाल अशा सजवलेल्या वेशातला नंदी लक्ष वेधून घेतो. भविष्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवून देतो, हे चित्र आपण अनेक वेळा अनुभवले आहे. नंदी शंकर महादेवाचा भक्त व सेवक असल्याची भावना असल्यामुळे लोकांच्या मनात नंदीवर श्रद्धा व त्याच्या भविष्यकथनाबद्दल आदर होता. याच श्रद्धा व आदरापोटी लोकांनी स्वखुशीने दिलेली दक्षिणा हेच नंदीवाल्या जमातींच्या उपजीविकेचे परंपरागत साधन होते. दिवाळी सण होताच नंदीवाले आपापला नंदी घेऊन खेळ दाखवायला राज्यात, राज्याबाहेरही जात असत. दिवाळीनंतर बाहेर पडल्यानंतर ते शिवरात्रीला परत येत होते. मात्र, सध्या या नंदीबैलाच्या खेळाचे आकर्षण घटले आहे.उपजीविकेचे साधन कमजोर झाले असून अभावग्रस्त आयुष्य जगावे लागत आहे. नंदीवाले जमात आंध्रातून दोन टप्प्यांत महाराष्ट्रात आली. या सर्वांची मातृभाषा तेलुगू आहे. यांना मराठी भाषा चांगल्या तऱ्हेने बोलता येतात. भटकेपणामुळे यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असले तरी नवीन पिढीतील यांची बरीच मुले-मुली शाळा शिकत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वडापुरी येथे दर तीन वर्षांनी या सर्व नंदीवाले जमातीची मोठी यात्रा भरते. मुख्यत: घरोघर फिरून छोटे छोटे कृत्रिम शोभिवंत दागिने, अशुभ किंवा वाईट गोष्टींपासून मुला-बाळांचे संरक्षण करणारे ताईत, बैलाच्या गळ्यात बांधण्यासाठी आवश्यक कवड्यांच्या आणि मोठ्या मण्यांच्या माळा, सुया-दाभण-बिब्बा, फणी-कंगवे-रिबिन आदी कटलरी वस्तू विक्रीचे काम आजही करतात.>...आजही राहायला पक्के घर नाहीआमचा समाज साधारण १९७० मध्ये येथे आला. गावोगावी भटकंती करीत असताना येथे मूळ चार कुटुंबे स्थिर झाली. पवार व वाघमोडे आडनावे येथे आहेत. आता पंधरा कुटुंबे आहेत. मात्र, आजही १३ कुटुंबांना राहायला पक्के घर नाही. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. पारंपरिक व्यवसाय आम्ही करीत नाही. मात्र, महिला कटलरी व्यवसाय फिरून करतात, थोडी शेती आहे. त्यावर आम्ही उदरनिर्वाह करीत आहे, अशी व्यथा गणेश पवार याने मांडली.