शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सेनेचे बिहारमध्ये ‘एकला चलो’!

By admin | Updated: September 21, 2015 09:24 IST

केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत

पाटणा/ मुंबई : केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत १५० उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी पाटणा येथे ही घोषणा केली. बिहारमध्ये सेनेची संघटनात्मक बांधणी नाही. त्यामुळे तेथे सेना फारच तुरळक जागा लढवत होती. महाराष्ट्रात जाणाऱ्या बिहारी माणसांच्या विरोधात असलेला अशी पक्षाची तिकडे ओळख आहे. केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत भागीदार असूनही त्यांना रालोआत सहभागी करून घेण्याबाबत साधी चर्चाही केली नाही. ही बाब शिवसेनेला खटकली असून, जुने-नवे हिशेब चुकते करण्याकरिता शिवसेना १५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मात्र हिंदुत्व, गरिबी व रोजगारनिर्मिती ही त्रिसूत्री घेऊन शिवसेना ही निवडणूक लढवणार असून, २५ जागा लढवणाऱ्या एमआयएमच्या धार्मिक प्रचाराला विरोध करण्याकरिता ‘अखंड भारत’ असे अभियान राबवण्याचे ठरवले आहे.रालोआचा घटक असलेली शिवसेना बिहारात एकटी का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे राऊत यांनी टाळले. शिवसेना हिंदी भाषिक प्रदेशांत आपला जनाधार वाढवून येथील लोकांना आपली शक्ती देऊ इच्छिते. म्हणून आम्ही येथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. ओवैसी एक ‘विष’ असदुद्दीन ओवैसी यांच्या आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षानेही बिहार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णयघेतला आहे. याबाबत विचारले असता, ‘अमृता’सोबत ‘विषा’ची कुठलीही चर्चा व्हायला नको. ओवैसी एक ‘विष’ असून, त्यांच्यासारखे लोक राजकारणात आले तर देश पुन्हा एकदा तुटेल, असे वादग्रस्त विधानही राऊत यांनी केले.युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे बिहार निवडणुकीची धुरा स्वत: सांभाळणार असून, तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता त्यांनी खासदार संजय राऊत व अनिल देसाई यांना धाडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार करतील तेव्हा आदित्य बिहारच्या मैदानात उतरलेले असतील!