शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

सेनेचे बिहारमध्ये ‘एकला चलो’!

By admin | Updated: September 21, 2015 09:24 IST

केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत

पाटणा/ मुंबई : केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत १५० उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी पाटणा येथे ही घोषणा केली. बिहारमध्ये सेनेची संघटनात्मक बांधणी नाही. त्यामुळे तेथे सेना फारच तुरळक जागा लढवत होती. महाराष्ट्रात जाणाऱ्या बिहारी माणसांच्या विरोधात असलेला अशी पक्षाची तिकडे ओळख आहे. केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत भागीदार असूनही त्यांना रालोआत सहभागी करून घेण्याबाबत साधी चर्चाही केली नाही. ही बाब शिवसेनेला खटकली असून, जुने-नवे हिशेब चुकते करण्याकरिता शिवसेना १५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मात्र हिंदुत्व, गरिबी व रोजगारनिर्मिती ही त्रिसूत्री घेऊन शिवसेना ही निवडणूक लढवणार असून, २५ जागा लढवणाऱ्या एमआयएमच्या धार्मिक प्रचाराला विरोध करण्याकरिता ‘अखंड भारत’ असे अभियान राबवण्याचे ठरवले आहे.रालोआचा घटक असलेली शिवसेना बिहारात एकटी का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे राऊत यांनी टाळले. शिवसेना हिंदी भाषिक प्रदेशांत आपला जनाधार वाढवून येथील लोकांना आपली शक्ती देऊ इच्छिते. म्हणून आम्ही येथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. ओवैसी एक ‘विष’ असदुद्दीन ओवैसी यांच्या आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षानेही बिहार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णयघेतला आहे. याबाबत विचारले असता, ‘अमृता’सोबत ‘विषा’ची कुठलीही चर्चा व्हायला नको. ओवैसी एक ‘विष’ असून, त्यांच्यासारखे लोक राजकारणात आले तर देश पुन्हा एकदा तुटेल, असे वादग्रस्त विधानही राऊत यांनी केले.युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे बिहार निवडणुकीची धुरा स्वत: सांभाळणार असून, तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता त्यांनी खासदार संजय राऊत व अनिल देसाई यांना धाडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार करतील तेव्हा आदित्य बिहारच्या मैदानात उतरलेले असतील!