शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सेनेचे बिहारमध्ये ‘एकला चलो’!

By admin | Updated: September 21, 2015 09:24 IST

केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत

पाटणा/ मुंबई : केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत १५० उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी पाटणा येथे ही घोषणा केली. बिहारमध्ये सेनेची संघटनात्मक बांधणी नाही. त्यामुळे तेथे सेना फारच तुरळक जागा लढवत होती. महाराष्ट्रात जाणाऱ्या बिहारी माणसांच्या विरोधात असलेला अशी पक्षाची तिकडे ओळख आहे. केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत भागीदार असूनही त्यांना रालोआत सहभागी करून घेण्याबाबत साधी चर्चाही केली नाही. ही बाब शिवसेनेला खटकली असून, जुने-नवे हिशेब चुकते करण्याकरिता शिवसेना १५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मात्र हिंदुत्व, गरिबी व रोजगारनिर्मिती ही त्रिसूत्री घेऊन शिवसेना ही निवडणूक लढवणार असून, २५ जागा लढवणाऱ्या एमआयएमच्या धार्मिक प्रचाराला विरोध करण्याकरिता ‘अखंड भारत’ असे अभियान राबवण्याचे ठरवले आहे.रालोआचा घटक असलेली शिवसेना बिहारात एकटी का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे राऊत यांनी टाळले. शिवसेना हिंदी भाषिक प्रदेशांत आपला जनाधार वाढवून येथील लोकांना आपली शक्ती देऊ इच्छिते. म्हणून आम्ही येथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. ओवैसी एक ‘विष’ असदुद्दीन ओवैसी यांच्या आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षानेही बिहार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णयघेतला आहे. याबाबत विचारले असता, ‘अमृता’सोबत ‘विषा’ची कुठलीही चर्चा व्हायला नको. ओवैसी एक ‘विष’ असून, त्यांच्यासारखे लोक राजकारणात आले तर देश पुन्हा एकदा तुटेल, असे वादग्रस्त विधानही राऊत यांनी केले.युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे बिहार निवडणुकीची धुरा स्वत: सांभाळणार असून, तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता त्यांनी खासदार संजय राऊत व अनिल देसाई यांना धाडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार करतील तेव्हा आदित्य बिहारच्या मैदानात उतरलेले असतील!