शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

चला पावसाळी पर्यटनाला...

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

कास पठार. महाबळेश्वर-पाचगणी हे सह्याद्रीच्या उत्तुंग गिरिशिखरावर वसलेले पर्यटनस्थळ तीनही ऋतूंत आकर्षित करते.

पा वसाळा सुरू होताच निसर्गप्रेमी पर्यटकांना वेध लागतात पावसाळी पर्यटनाचे. जिल्ह्यात महाबळेश्वर जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ. त्याचबरोबर पाचगणी, वाई, कोयनानगर आणि गेल्या काही वर्षात पर्यटक पसंती देत असलेले कास पठार. महाबळेश्वर-पाचगणी हे सह्याद्रीच्या उत्तुंग गिरिशिखरावर वसलेले पर्यटनस्थळ तीनही ऋतूंत आकर्षित करते. पावसाळ्यात धुक्याचे वातावरण आणि पावसाच्या सरी यामुळे पर्यटकांची पहिली पसंती महाबळेश्वरला असते.पावसाळ्यात पर्यटक आवर्जून भेट देतात लिंगमळा धबधब्याला. कड्यावरून कोसळणारे दुधासारखे शुभ्र पाणी पाहताना पर्यटक मुग्ध होतात. धुक्यात हरवलेल्या पायवाटेने धबधब्यापर्यंत जाताना वेगळाच रोमांच अनुभवास मिळतो. केट्स पॉर्इंट, मंकी पॉर्इंट, हत्तीचा माथा व येथूनच दिसणारे बलकवडी डॅमचे दृष्य पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मिनी काश्मिर म्हणून संबोधले जाणारे तापोळा पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने नटलेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रतापगड किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत पावसाळ्यात वेगळाच अनुभव देतो. पाचगणी येथील जगप्रसिद्ध ‘टेबल लॅण्ड’ पाहण्यास पर्यटक पसंती देतात. पावसाळ्यात ढग जणू जमिनीवरच उतरले असावे असावा अनुभव टेबल लॅण्डवर मिळतो. पारशी पॉर्इंट, सिडनी पॉर्इंट येथून निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवास मिळतात.वाईमध्ये तुलनेने पाऊस कमी असतो. अशा वेळी बलकवडी धरणाला पर्यटक पसंती देतात. शिवकालीन किल्ले, लेणी, सातवाहन काळातील प्राचीन मंदिरे, सरोवर थाट, डोंगरदऱ्या असा हा सर्वगुणसंपन्न अशा नैसर्गिक सौंदर्याने व्यापलेला सातारा जिल्ह्यात पर्यटकांना कास आणि कोयना ही ठिकाणे पर्यटकांना खुणावत आहे. कास पठारावर फुलणारी विविध जातींची प्रदेशनिष्ठ फुले पाहण्यासाठी देशभरातून नव्हे तर विदेशातूनही पर्यटक येत असतात. कास पठारावर फुललेली विविधरंगी फुले, रिमझिम पाऊस, ऊनपावसाचा लपंडाव अनुभवण्यास आलेले पर्यटक निसर्गसृष्टी पाहून सर्व तणाव, थकवा विसरतात.- राहिल वारुणकर, महाबळेश्वर