शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

चला पावसाळी पर्यटनाला...

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

कास पठार. महाबळेश्वर-पाचगणी हे सह्याद्रीच्या उत्तुंग गिरिशिखरावर वसलेले पर्यटनस्थळ तीनही ऋतूंत आकर्षित करते.

पा वसाळा सुरू होताच निसर्गप्रेमी पर्यटकांना वेध लागतात पावसाळी पर्यटनाचे. जिल्ह्यात महाबळेश्वर जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ. त्याचबरोबर पाचगणी, वाई, कोयनानगर आणि गेल्या काही वर्षात पर्यटक पसंती देत असलेले कास पठार. महाबळेश्वर-पाचगणी हे सह्याद्रीच्या उत्तुंग गिरिशिखरावर वसलेले पर्यटनस्थळ तीनही ऋतूंत आकर्षित करते. पावसाळ्यात धुक्याचे वातावरण आणि पावसाच्या सरी यामुळे पर्यटकांची पहिली पसंती महाबळेश्वरला असते.पावसाळ्यात पर्यटक आवर्जून भेट देतात लिंगमळा धबधब्याला. कड्यावरून कोसळणारे दुधासारखे शुभ्र पाणी पाहताना पर्यटक मुग्ध होतात. धुक्यात हरवलेल्या पायवाटेने धबधब्यापर्यंत जाताना वेगळाच रोमांच अनुभवास मिळतो. केट्स पॉर्इंट, मंकी पॉर्इंट, हत्तीचा माथा व येथूनच दिसणारे बलकवडी डॅमचे दृष्य पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मिनी काश्मिर म्हणून संबोधले जाणारे तापोळा पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने नटलेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रतापगड किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत पावसाळ्यात वेगळाच अनुभव देतो. पाचगणी येथील जगप्रसिद्ध ‘टेबल लॅण्ड’ पाहण्यास पर्यटक पसंती देतात. पावसाळ्यात ढग जणू जमिनीवरच उतरले असावे असावा अनुभव टेबल लॅण्डवर मिळतो. पारशी पॉर्इंट, सिडनी पॉर्इंट येथून निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवास मिळतात.वाईमध्ये तुलनेने पाऊस कमी असतो. अशा वेळी बलकवडी धरणाला पर्यटक पसंती देतात. शिवकालीन किल्ले, लेणी, सातवाहन काळातील प्राचीन मंदिरे, सरोवर थाट, डोंगरदऱ्या असा हा सर्वगुणसंपन्न अशा नैसर्गिक सौंदर्याने व्यापलेला सातारा जिल्ह्यात पर्यटकांना कास आणि कोयना ही ठिकाणे पर्यटकांना खुणावत आहे. कास पठारावर फुलणारी विविध जातींची प्रदेशनिष्ठ फुले पाहण्यासाठी देशभरातून नव्हे तर विदेशातूनही पर्यटक येत असतात. कास पठारावर फुललेली विविधरंगी फुले, रिमझिम पाऊस, ऊनपावसाचा लपंडाव अनुभवण्यास आलेले पर्यटक निसर्गसृष्टी पाहून सर्व तणाव, थकवा विसरतात.- राहिल वारुणकर, महाबळेश्वर