शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उर्वरित एफआरपी एकत्रित द्या

By admin | Updated: April 22, 2016 01:07 IST

राज्य सरकार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार चालू हंगामातील उसाची एफआरपी ही ८०-२० या सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक आहे.

सोमेश्वरनगर : राज्य सरकार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार चालू हंगामातील उसाची एफआरपी ही ८०-२० या सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक आहे. उर्वरित २० टक्के एफआरपीची रक्कम देण्यासाठीदेखील तुकडे पाडण्याचा डाव साखर कारखानदारांचा आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. केंद्र व राज्य सरकार साखर कारखान्यांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात एफआरपीची रक्कम आदा करण्यात आली. राज्यातील १४७ साखर कारखान्यांना १९८२ कोटी रूपये बिन्याची कर्ज मंजूर केले. यामध्ये पुणे जिल्हयाच्या वाटयाला १८१ कोटी ६० लाख रूपये आले होते. यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एक रकमी एफआरपी मिळण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासन व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत ८० टक्के एफआरपी लगेच तर कारखाने बंद होताच उर्वरीत २० टक्के एफआरपी अदा करण्याबाबतचे सुत्र ठरले होते. साखरेचा दर वाढला आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. २० टक्के एफआरपीची उर्वरित रक्कम एकत्रित द्यावी, अशी ऊस उत्पादकांची मागणी आहे. मात्र, कारखानदारांनी २० टक्क्यांमध्ये देखील दोन टप्पे पाडण्याचा प्रकार सुरू केला आहे. एफआरपीचे मात्र दिवाळीसाठी १० टक्के व आता १० टक्के, असे अनेक कारखान्यांने उर्वरीत २० टकके एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या विचारात आहेत. राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांनी ८० टक्के प्रमाणे एफआरपी ऊसउत्पादकांना अदा केलेली आहे. मात्र आता उर्वरीत २० टक्के एफआरपी अदा करण्याची वेळ आली असतानाही साखरेला चांगले दर असतानाही २० टकके एफआरपी अदा करण्याबाबत साखर कारखाने नाक मुरडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.> उर्वरित २० टक्के एफआरपी ही व्याजासहीत द्यावी असा केंद्र सरकारचा कायदाच आहे. साखरेचे दर चांगल्या प्रकारे वाढले आहेत, त्यामुळे कारखानदारांनी लपू नये, एकरकमी एफआरपी अदा करावी, असे न झाल्याने राज्य सरकारने कारखान्यांवर प्रशासक नेमून ऊस उत्पादकांना एफआरपीचे पैसे अदा करावेत. - पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, साखर संघ