शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र पालकत्त्व हीच मुलांसाठी आदर्श स्थिती

By admin | Updated: January 16, 2016 01:40 IST

सध्या घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुलांचा ताबा ही अत्यंत जिकिरीची बाब बनली आहे. त्यात एका खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने मुलीचा ताबा आई-वडिलांकडे

मुंबई : सध्या घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुलांचा ताबा ही अत्यंत जिकिरीची बाब बनली आहे. त्यात एका खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने मुलीचा ताबा आई-वडिलांकडे विभागून देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. हा निर्णय देताना भारतातही मुलांचा ताबा विभागून देण्याची पद्धत रुजवण्यात येण्याची गरजही उच्च न्यायालयाने व्यक्त केली. त्यामुळे एकत्र पालकत्त्व हीच मुलांसाठी आदर्श स्थिती असून एकट्या पालकाकडे मूल ठेवण्याचा अपवाद असावा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. या केसमध्ये न्यायालयाने सहा वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या आई व वडिलांना विभागून दिला आहे. महिन्यातील तेरा दिवस ही मुलगी आईकडे तर उर्वरित १७ दिवस वडिलांकडे राहिल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. अशा प्रकारे मुलीचा ताबा विभागून देणारी ही राज्यातील पहिलीच केस असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.वांद्रे कुटुंब न्यायालयाने भूषण अहिरे आणि कुमुद अहिरे (बदलेली नावे) यांना त्यांच्या मुलीचा ताबा लॉ कमिशनच्या शिफारशीनुसार सहा-सहा महिने विभागानून दिला. या निकालाला भूषण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठापुढे होती. आर्थिक आणि सामाजिक विकासामुळे मुलाच्या ताब्याची संकल्पना दिवसेंदिवस बदलत आहे. अलिकडे महिलाही घराबाहेर पडून आर्थिकरित्या स्वतंत्र झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना दुय्यम स्थान देता येणार नाही. मुलाच्या संगोपनात आणि त्यांच्या करिअरबाबत त्याही तेवढ्याच सक्षमपणे निर्णय घेतात, असे न्या. भाटकर यांनी म्हटले.‘सगळयाच पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसते. जर एक मूल असेल तर पालक त्याच्यावर भेट वस्तूंचा वर्षाव करतात. यामुळे मुलं स्वार्थी आणि हट्टी बनतात. पालकांनी मुलांचे प्रेम आणि स्नेह विकत घेण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंब न्यायालयाने मुलाचा ताबा देण्यापूर्वी मूल पालकांच्या भावनांचे बळी तर पडले नाही ना? याची खात्री करावी,’ असा सल्ला उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला दिला आहे.पालक वेगळे होणे, हा मुलासाठी मोठा धक्का असतो. त्यातून मुलामध्ये भीतीची भावना बळावते. या परिस्थितीसाठी कोणाला दोष द्यावा, हे त्याला कळत नाही. कधीकधी मूल स्वत:लाच दोषी ठरवते. त्यामुळे कदाचित ज्या पालकाकडे त्याचा ताबा नसतो, त्याचा तिरस्कार करणे सुरु होते. त्यामुळे ताबा असलेल्या पालकाने दुसऱ्या पालकाविषयी मुलाला घृणा वाटेल, असे बोलू नये, असेही न्या. भाटकर यांनी म्हटले. (प्रतिनिधी)दोघांचेही प्रेम मिळाले पाहिजेमुलाला त्यांचे दु:ख, आनंद, यश, अपयश त्याच्या पालकांकडे व्यक्त करायचे असते. त्यामुळे एका पालकापासून दूर असलेल्या मुलाला दोन्हीन पालकांची गरज असते. ही गरज भागल्यास त्याचे संगोपन उत्तमरित्या होऊ शकते. मुलाला सामाजिक सुरक्षा मिळणे आवश्यक आहे. त्याला आपण घटस्फोटित आई-वडिलांचे मूल आहोत, असे वाटून ते आत्मकेंद्री होता कामा नये. त्यामुळे मूल कदाचित त्याच्या मित्रांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय बनू शकते. त्यामुळे मुलांचे पालनपोषण करताना दोन्ही पालकांचे प्रेम मिळणे आवश्यक आहे असे उच्च न्यायालयाने म्हटले.मुले ही समस्या नव्हे तर पालकत्व ही समस्याआत्तापर्यंत मुलांचा ताबा देताना मुलाचे हित, हेच अत्यंत महत्त्वाचे मानले जायचे. मात्र सध्याच्या काळात मुलाचा ताबा देताना पालकांची मानसिक स्थिती, मुलाचे संगोपन करताना पालकावर येणारा आर्थिक तणाव याचाही विचार करणे आवश्यक आहे. पालकाच्या घरात चांगले वातावरण असेल, तरच मुलही आनंदी जगू शकते, याचा विचार मुलांचा ताबा देताना करायला हवा. मूल ही समस्या असू शकत नाही तर पालकत्त्व हीच समस्या आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.शिफारसी नीट लक्षात घ्यालॉ कमिनशनच्या शिफारसी नीट लक्षात न घेता कुटुंब न्यायालयाने दोन्ही पालकांवर जाचक अटी घातल्या आहेत. मुलीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दरवेळी न्यायालयाला कळवण्याचा आदेश दिला आहे. हे शक्य नसल्याचे भूषण यांनी याचिकेत म्हटले आहे.लॉ कमिशनने केलेल्या शिफारशी या बंधनकारक आहेत, असे समजून कुटुंब न्यायालयाने प्रत्येक केसमध्ये ‘ज्वॉइंट पॅरेन्टिंग’ लागू करू नये. प्रत्येक केसमधील पालकांना यासाठी भाग पाडू नये. ज्या केसमध्ये हे लागू केले जाऊ शकते, त्याच केससमध्ये याबाबत विचार करावा,’ असे न्या. भाटकर यांनी म्हटले.