शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

परीक्षेच्या तोंडावर सात जिल्ह्यांतील महाविद्यालये ठप्प; मुंबई, पुणे, मराठवाड्यात नियमितपणे तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 03:09 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे बंद आहे.

- संतोष मिठारीकोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे बंद आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मराठवाड्यात आंदोलनाचा फारसा परिणाम झाला नसून, येथील महाविद्यालयात नियमितपणे तास होत आहेत.महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशनच्या (एम्फुक्टो) नेतृत्वाखाली राज्यातील प्राध्यापकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एम्फुक्टो आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे एम्फुक्टोने आंदोलनाची तीव्रता वाढविली. या आंदोलनाला तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे.कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील १२४३ प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. या जिल्ह्यांतील ८० टक्के महाविद्यालयांमध्ये तास होत नाहीत. नाशिक जिल्ह्यातील ८०० प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. अहमदनगरमधील प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयासमोर रोज निदर्शने करतात. वाशिम आणि यवतमाळमधील प्राध्यापकांनी ‘खडूफळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. ठाणे शहरातील ८० टक्के प्राध्यापक आंदोलनात सहभागी असल्याने येथील महाविद्यालयात वर्ग भरत नाहीत. मराठवाड्यात मोर्चा, सामूहिक रजा आंदोलनाद्वारे ते निषेध व्यक्त करीत आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्परीक्षार्थीं विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. पुणे शहरात आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद आहे. पुणे ग्रामीण, नगर भागात काही परिणाम जाणवत आहे.या ठिकाणी एक-दोन दिवसांचे आंदोलनचंद्रपूर जिल्ह्यात ‘बेमुदत कामबंद’ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शासनाचा निषेध करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत असलेल्या नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये एक ते दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोलीमध्ये दि. २५ आणि २६ सप्टेंबरला निदर्शने करण्यात आली. त्यानंतर, नियमितपणे तासिका आणि महाविद्यालयांचे कामकाज सुरू आहे.संघटनेला मुख्यमंत्री चर्चेसाठी बोलवित नाहीत. त्यामुळे आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानाला राज्य सरकार जबाबदार आहे. बहुतांश महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यापीठांकडे केली जाणार आहे.- प्रा. डॉ. सुभाष जाधव, उपाध्यक्ष, ‘एम्फुक्टो’

टॅग्स :examपरीक्षा