शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

काॅलेज विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून कोरोना लसीकरण मोहीम राबवणार- उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:54 IST

महाविद्यालयांतील पहिला ऑफलाईन वर्ग संवादाचा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, येत्या ७ ते ८ दिवसात म्हणजेच २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान व्यापक लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बुधवारी सिडनेहॅम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.सध्यस्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे २ डोस पूर्ण केले आहेत त्यांनी सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी, असे उदय सामंत आवाहन केले आहे. महाविद्यालयानाही विद्यार्थी पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. विद्यापीठांची वसतिगृहे ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून दिवाळीनंतर ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे उपस्थित राहून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने फार्मसी, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अशा ३६ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्हीजेटीआय संस्थेतील जे विद्यार्थी एमएचटी सीईटी परीक्षेत पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये असतील त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.  ‘लोकल प्रवासाचा प्रश्न २-३ दिवसांत सुटेल’महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यात काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयासाठी प्रवास करत आहेत, त्यांनी त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र  दाखवल्यावर तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिले आहे. ही समस्या येत्या दोन-तीन दिवसात मार्गी लागणार आहे असे आश्वासन सामंत यांनी यावेळी दिले.विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण मंत्र्यांची उत्तरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन - ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोविड काळानंतरच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यासंदर्भात उत्तर देताना आवश्यकता असेल तिथेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करू अन्यथा यापुढील परीक्षा ऑफलाईन स्वरूपातच होतील. अनेक विद्यार्थ्यांना कोविड बॅच म्हणून नोकरीत डावलले जाण्याची भीती वाटत आहे, यावर विद्यार्थ्यांची भीती दूर करताना जे खासगी उद्योजक विद्यार्थ्यांना पुढील काळात या कारणाने नोकरी नाकारतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला आहे. शासकीय संस्थांकडून विद्यार्थ्यांना डावलले जाण्याचा प्रश्नच येणार नसल्याने विद्यार्थ्यांना निश्चिंत रहावे, असा दिलासाही त्यांनी दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हापासून व कसे राबविले जाणार याचे उत्तर देताना ३ टप्प्यांत ते राबविले जाणार आहे. पहिल्या टप्प्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या