शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

राज्यात ३ हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:37 IST

धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला

हणमंत गायकवाडलातूर : धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला असून, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ७७६ जोडप्यांचा विवाह झाला. सामूहिक विवाह सोहळ्याची ही चळवळ आता गावपातळीवर नेण्याचा मानस असल्याचे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उपवर मुलींच्या लग्नाची चिंता पालकांना भेडसावते. मात्र, धर्मादाय संस्थांच्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, राज्यात ठिकठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होत आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात घरचे लग्न समजून अनेक जण राबत आहेत. आतापर्यंत ३ हजार ४६ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात शुभमंगल झाले आहे. त्यात मुंबई विभागातील ठाणे ७७६, रायगड ४६, नाशिक विभागात नाशिक १२०, धुळे ५१, जळगाव ६३, नंदूरबार ८४, पुणे विभागात पुणे ३०१, अहमदनगर १४, सातारा ६२, सोलापूर १२०, कोल्हापूर विभागात कोल्हापूर ६२, सांगली २०, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद विभागात औरंगाबाद १३१, परभणी १, नांदेड २६, हिंगोली १००, लातूर विभागात लातूर ४५, उस्मानाबाद ७६, बीड १०१, अमरावती विभागात अमरावती ५१, अकोला ३९, बुलढाणा १०१, यवतमाळ ७५, वाशिम २०, नागपूर विभागात नागपूर ५१, भंडारा ६, चंद्रपूर ७५, गडचिरोली १०२, गोंदिया ११ असे एकूण ३ हजार ४६ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला. जून महिन्यामध्ये वर्धा आणि जालना येथे सामूहिक विवाह सोहळा होणार असल्याचेही धर्मादाय आयुक्त डिगे यांनी सांगितले.एकाच मंचावर जाती-धर्मातील जोडप्यांचे विवाह सोहळे होत असल्याने सामाजिक सलोखाही वाढत आहे. ही चळवळ गावपातळीवर नेण्याचा प्रयत्न धर्मादायचा असेल, असे शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले.