शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३ हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:37 IST

धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला

हणमंत गायकवाडलातूर : धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला असून, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ७७६ जोडप्यांचा विवाह झाला. सामूहिक विवाह सोहळ्याची ही चळवळ आता गावपातळीवर नेण्याचा मानस असल्याचे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उपवर मुलींच्या लग्नाची चिंता पालकांना भेडसावते. मात्र, धर्मादाय संस्थांच्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, राज्यात ठिकठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होत आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात घरचे लग्न समजून अनेक जण राबत आहेत. आतापर्यंत ३ हजार ४६ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात शुभमंगल झाले आहे. त्यात मुंबई विभागातील ठाणे ७७६, रायगड ४६, नाशिक विभागात नाशिक १२०, धुळे ५१, जळगाव ६३, नंदूरबार ८४, पुणे विभागात पुणे ३०१, अहमदनगर १४, सातारा ६२, सोलापूर १२०, कोल्हापूर विभागात कोल्हापूर ६२, सांगली २०, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद विभागात औरंगाबाद १३१, परभणी १, नांदेड २६, हिंगोली १००, लातूर विभागात लातूर ४५, उस्मानाबाद ७६, बीड १०१, अमरावती विभागात अमरावती ५१, अकोला ३९, बुलढाणा १०१, यवतमाळ ७५, वाशिम २०, नागपूर विभागात नागपूर ५१, भंडारा ६, चंद्रपूर ७५, गडचिरोली १०२, गोंदिया ११ असे एकूण ३ हजार ४६ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला. जून महिन्यामध्ये वर्धा आणि जालना येथे सामूहिक विवाह सोहळा होणार असल्याचेही धर्मादाय आयुक्त डिगे यांनी सांगितले.एकाच मंचावर जाती-धर्मातील जोडप्यांचे विवाह सोहळे होत असल्याने सामाजिक सलोखाही वाढत आहे. ही चळवळ गावपातळीवर नेण्याचा प्रयत्न धर्मादायचा असेल, असे शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले.