शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राज्यात ३ हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:37 IST

धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला

हणमंत गायकवाडलातूर : धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला असून, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ७७६ जोडप्यांचा विवाह झाला. सामूहिक विवाह सोहळ्याची ही चळवळ आता गावपातळीवर नेण्याचा मानस असल्याचे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उपवर मुलींच्या लग्नाची चिंता पालकांना भेडसावते. मात्र, धर्मादाय संस्थांच्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, राज्यात ठिकठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होत आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात घरचे लग्न समजून अनेक जण राबत आहेत. आतापर्यंत ३ हजार ४६ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात शुभमंगल झाले आहे. त्यात मुंबई विभागातील ठाणे ७७६, रायगड ४६, नाशिक विभागात नाशिक १२०, धुळे ५१, जळगाव ६३, नंदूरबार ८४, पुणे विभागात पुणे ३०१, अहमदनगर १४, सातारा ६२, सोलापूर १२०, कोल्हापूर विभागात कोल्हापूर ६२, सांगली २०, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद विभागात औरंगाबाद १३१, परभणी १, नांदेड २६, हिंगोली १००, लातूर विभागात लातूर ४५, उस्मानाबाद ७६, बीड १०१, अमरावती विभागात अमरावती ५१, अकोला ३९, बुलढाणा १०१, यवतमाळ ७५, वाशिम २०, नागपूर विभागात नागपूर ५१, भंडारा ६, चंद्रपूर ७५, गडचिरोली १०२, गोंदिया ११ असे एकूण ३ हजार ४६ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला. जून महिन्यामध्ये वर्धा आणि जालना येथे सामूहिक विवाह सोहळा होणार असल्याचेही धर्मादाय आयुक्त डिगे यांनी सांगितले.एकाच मंचावर जाती-धर्मातील जोडप्यांचे विवाह सोहळे होत असल्याने सामाजिक सलोखाही वाढत आहे. ही चळवळ गावपातळीवर नेण्याचा प्रयत्न धर्मादायचा असेल, असे शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले.