शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे गोळा करा

By admin | Updated: August 2, 2016 03:36 IST

डोंबिवलीतील ८६ रासायनिक कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

डोंबिवली : डोंबिवलीतील ८६ रासायनिक कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसांना स्थगिती देण्यासाठी कंपनीमालकांनी ‘कामा’ या संघटनेमार्फत राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. लवादाने त्यांच्या याचिकेवर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रासायनिक कंपन्यांतील सांडपाणी टँकरद्वारे गोळा करण्याचा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालक मंडळाने दिला आहे. टँकरद्वारे सांडपाणी गोळा केल्यास नेमके कोणत्या प्रकारच्या कंपन्यांतून जास्त प्रदूषित सांडपाणी सोडले जाते, याचा छडा लागेल, असा विश्वास सांडपाणी प्रक्रिया केंद्राने व्यक्त केला आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्यात प्रदूषणाची मात्रा जास्त आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून प्रक्रिया करताना आखून दिलेल्या निकषांची पूर्तता केली जात नाही. याप्रकरणी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेतर्फे दाखल केलेली याचिका लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. लवादाने याप्रकरणी प्रदूषण मंडळासह सगळ्यांना चांगलेच फटकारले. परिणामी, प्रदूषण मंडळाने २ जुलैला डोंबिवलीतील ८६ व अंबरनाथमधील ५६ रासायनिक कारखान्यांना बंदची नोटीस बजावली. त्यामुळे ११ जुलैला कंपनीमालकांनी ‘कामा’च्या मध्यस्थीने लवादाकडे धाव घेतली. नोटिसांना स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. यावर, सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी लवादाने कंपन्यांनी केलेली मागणी मान्य केलेली नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ आॅगस्टला होणार आहे.डोंबिवली फेज-१ मध्ये १६ दशलक्ष लीटर क्षमतेचे व फेज-२ मध्ये दीड दशलक्ष लीटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या दोन्ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रांत रासायनिक व कापड उद्योग प्रक्रिया कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी होते. दोन्ही उद्योगांचे सांडपाणी एकाच पाइपलाइनद्वारे प्रक्रियेसाठी पाठवले जात असल्याने प्रदूषणाची मात्रा नेमकी कोणत्या प्रकारच्या सांडपाण्यामुळे कमी होत नाही, याचा शोध घेता येत नाही. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालक मंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी टँकरद्वारे वाहून नेण्याची परवानगी मागितली आहे. अल्पावधी काळासाठी ही परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सांडपाणी प्रक्रिया केंद्राने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केला. मात्र, त्याला मंडळाने अजूनही परवानगी दिलेली नाही. तसेच हा प्रस्ताव लवादासमोर मांडलेला नाही. त्याचे कारण कंपन्या टँकरद्वारे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेण्याची परवानगी मागत असल्या तरी त्यात किती कालावधी व मुदतीचा काही संदर्भ दिलेला नाही. त्यात कालावधी नमूद केलेला नाही. हा उपाय अल्पावधीसाठी असला तरी दीर्घकाळासाठी होऊ शकत नाही. या अंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विचार सुरू असावा. लवादाने यावर काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे लवादाने कंपन्या बंदच्या नोटिसांना स्थगिती देण्याच्या अर्जावर १९ आॅगस्टला सुनावणी ठेवली आहे.>कापड उद्योग प्रक्रिया कंपन्यातील सांडपाणी पाइपलाइनद्वारे वाहून न्यावे. दोन वेगळ्या प्रकारच्या कंपन्यांतून सांडपाणी वेगवेगळे वाहून नेल्यास नेमके कोणत्या प्रकारच्या कंपन्यांतून जास्त मात्रा असलेले प्रदूषित पाणी पाठवले जाते, त्यावर प्रक्रिया करून त्याची मात्रा कमी होत नाही, हे शोधणे व सिद्ध होणे शक्य होईल. तसेच प्रदूषणकारी कंपनीवरही लक्ष देता येईल, असा दावा उद्योजकांनी केला आहे.