शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

युती तुटणार नाही, समजा तुटलीच तरी भाजपाला पाठिंबा नाही - शरद पवार

By admin | Updated: October 14, 2015 16:33 IST

शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, परंतु समजा काही कारणानं युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी घेणार नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, परंतु समजा काही कारणानं युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी घेणार नाही असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिवसेना स्वत:चेच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मागाहून शिवसेना सत्तेत सामील झाली, त्यामुळे आता बाहेर पडायचा प्रश्न आला तर शिवसेनेनेच बाहेर पडायला हवं असं पवार म्हणाले. एक वर्षापूर्वी स्थिर सरकार ही गरज होती त्यामुळे आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता असे सांगत आता तशी वेळ नसल्याचे पवार म्हणाले. अर्थात, शिवसेना असं काही करेल असं मला वाटत नाही असं सांगतानाच, समजा तसं झालंच तर आता एका वर्षानंतर भाजपाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही असे सांगत थोडक्यात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतील असे संकेत पवारांनी दिले आहेत. कसुरी यांच्या कार्यक्रमासंदर्भात घडलेला प्रकार अशोभनीय असून भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही असेही पवार म्हणाले.
 
शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
 
- सुरूवातीला स्वाभिमानी बाणा दाखवणारे लोक आता सोशिक भूमिकेत शिरले आहेत, वेळोवेळी त्यांचा अपमान होऊनही, त्यांची जागा दाखवण्यात आली असूनही ते सहन करत त्यांनी खुर्ची सोडण्याची तयारी दाखवलेली नाही.
- सनातनची भाषा चिंताजनक आहे, सरकारने कडक भूमिका घ्यावी.
- भाजपा राज्यातील मोठा पक्ष, त्यांना जबाबादारी टाळता येणार नाही.
- कसुरींच्या कार्यक्रमाबाबत जे घडलं ते अशोभनीय होतं.
- आम्ही कधीही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, सरकारला पाठिंबाही देणार नाही.
- शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही.
- साहित्यिकांनी चिंता व्यक्त केली आहे, ते काळजी करण्यासारखे आहे.
- हे सरकार चालेल की नाही हे माहीत नाही, पण ते टिकेल.
- आज सहिष्णुता दिसत नाही, राज्यातील अतिरेकी पावलांचे समर्थन केले जात आहे.
- दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे.
- देशातील आणि राज्यातील वातावरण चिंताजनक आहे.
- कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही अन्नसुरक्षा योजनेची अद्याप अमलबजावणी नाही.
- पंतप्रधान नद्र मोदींनी शेतक-यांची फसवणूक केली आहे.
- सरकारची दुष्काळग्रस्त भागाला ठोस मदत नाही.