शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

युती तुटणार नाही, समजा तुटलीच तरी भाजपाला पाठिंबा नाही - शरद पवार

By admin | Updated: October 14, 2015 16:33 IST

शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, परंतु समजा काही कारणानं युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी घेणार नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, परंतु समजा काही कारणानं युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी घेणार नाही असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिवसेना स्वत:चेच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मागाहून शिवसेना सत्तेत सामील झाली, त्यामुळे आता बाहेर पडायचा प्रश्न आला तर शिवसेनेनेच बाहेर पडायला हवं असं पवार म्हणाले. एक वर्षापूर्वी स्थिर सरकार ही गरज होती त्यामुळे आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता असे सांगत आता तशी वेळ नसल्याचे पवार म्हणाले. अर्थात, शिवसेना असं काही करेल असं मला वाटत नाही असं सांगतानाच, समजा तसं झालंच तर आता एका वर्षानंतर भाजपाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही असे सांगत थोडक्यात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतील असे संकेत पवारांनी दिले आहेत. कसुरी यांच्या कार्यक्रमासंदर्भात घडलेला प्रकार अशोभनीय असून भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही असेही पवार म्हणाले.
 
शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
 
- सुरूवातीला स्वाभिमानी बाणा दाखवणारे लोक आता सोशिक भूमिकेत शिरले आहेत, वेळोवेळी त्यांचा अपमान होऊनही, त्यांची जागा दाखवण्यात आली असूनही ते सहन करत त्यांनी खुर्ची सोडण्याची तयारी दाखवलेली नाही.
- सनातनची भाषा चिंताजनक आहे, सरकारने कडक भूमिका घ्यावी.
- भाजपा राज्यातील मोठा पक्ष, त्यांना जबाबादारी टाळता येणार नाही.
- कसुरींच्या कार्यक्रमाबाबत जे घडलं ते अशोभनीय होतं.
- आम्ही कधीही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, सरकारला पाठिंबाही देणार नाही.
- शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही.
- साहित्यिकांनी चिंता व्यक्त केली आहे, ते काळजी करण्यासारखे आहे.
- हे सरकार चालेल की नाही हे माहीत नाही, पण ते टिकेल.
- आज सहिष्णुता दिसत नाही, राज्यातील अतिरेकी पावलांचे समर्थन केले जात आहे.
- दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे.
- देशातील आणि राज्यातील वातावरण चिंताजनक आहे.
- कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही अन्नसुरक्षा योजनेची अद्याप अमलबजावणी नाही.
- पंतप्रधान नद्र मोदींनी शेतक-यांची फसवणूक केली आहे.
- सरकारची दुष्काळग्रस्त भागाला ठोस मदत नाही.