शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

...तर राज्यात लवकरच भारनियमन; कोळशाचा पुरवठा ठप्प झाल्यानं वीज संकटाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:50 IST

कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम; नाइलाजास्तव करावे लागेल भारनियमन

- सचिन लुंगसे मुंबई : वेस्टर्न कोल लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. याचा परिणाम वीजनिर्मितीवर होत असून, राज्यातील विजेचे व्यवस्थापन करण्यासाठी महावितरणने खुल्या बाजारातून वीज विकत घेतली आहे. राज्याची दररोजची मागणी १५ हजार मेगावॅट असून, पुरवठाही तेवढाच आहे. मात्र कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याने त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यात महावितरणला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागणार आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशामध्ये वेस्टर्न कोल लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कर्मचाऱ्यांनी संप केल्याने राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती कंपनीची वीजनिर्मितीची क्षमता १० हजार मेगावॅटच्या वर असताना येथून केवळ २८०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. अदानी कंपनीची क्षमता ३ हजार मेगावॅट असताना येथून १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. असे असतानाही महाराष्ट्रात भारनियमन होऊ नये यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. महावितरण सर्वसाधारण २ हजार मेगावॅट वीज खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) ३ रुपये २० पैसे दराने घेत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक्सचेंजमधील वीज ही भरवशाची नसते. या कारणात्सव वीजनिर्मिती कंपन्यांनी यातून मार्ग काढून अधिकाधिक वीजनिर्मिती करणे गरजेचे आहे. दरम्यान, उद्या कोळशाचा पुरवठा कमी झाला; किंवा वीजनिर्मिती बंद पडली तर राज्यावर भारनियमनाचे संकट ओढविणार आहे.दररोज ३२ रॅक कोळशाची गरजसूत्रांच्या म्हणण्यानुसार, दररोज महानिर्मिती कंपनीला ३२ रॅक कोळशाची गरज आहे. मात्र रोज डब्ल्यूसीएलकडून १२ रॅक कोळसा मिळत आहे. कोळशाचा पुरवठा ठप्प झाला आणि वीजनिर्मिती ठप्प झाली तर महाराष्ट्र अंधारात जाईल. असे होऊ नये यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. १५ हजार मेगावॅटची मागणी असून, पुरवठाही तेवढाच आहे. आता व्यवस्थापन नीट होत आहे. मात्र भविष्याचे काय, याचे उत्तर तूर्तास कोणाकडेच नाही.

टॅग्स :electricityवीज