शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा

By admin | Updated: April 19, 2016 04:09 IST

सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून, या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती शक्य होते.

नागपूर : सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून, या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती शक्य होते. तथापि, या बँकांनी केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता समाजात उद्योजकतेचा विकास कसा होईल यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व खासदार विजय दर्डा हे होते. या वेळी नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सहकारी बँकांचे ‘नेटवर्क’ चांगले आहे व त्यांच्याच प्रयत्नांमुळे सावकारांच्या मनमानीवर नियंत्रण आले आहे. सहकारी बँकांनी नक्कीच नफा कमविला पाहिजे. परंतु समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. बदलते आर्थिक चित्र लक्षात घेताव्याजदर कमी व्हावा, ही जनतेची अपेक्षा आहे.येणारा काळ हा सहकारी संस्थांसाठी कठीण आहे. परंतु हे आव्हान स्वीकारून या संधीचे सोनेदेखील करता येऊ शकते. सहकारी संस्थांनी गरिबांना मदतीचा हात दिला तर जनतेचा विश्वास संपादन होऊ शकेल; शिवाय प्रगती करणाऱ्या संस्थांनी बुडणाऱ्या संस्थांना आधार दिला तर विदर्भात सहकार आणखी वाढेल. बँकांना वर आणण्यासाठी संबंधित कायद्यातदेखील काही बदल आवश्यक आहेत, असेदेखील गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)