शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

कर्जमाफीत खोटी माहिती आढळल्यास गुन्हे नोंदवणार : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:04 IST

कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधारसहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारीचावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल. लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार घेण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आलेल्या सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असा दावा केला. ते म्हणाले, सर्व्हर डाऊन आणि अन्य कारणामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन कर्जमाफीच्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर चावडीवाचन घेतले जाईल. निकषात न बसणाºया खातेदारांना पुरेसे पुरावे न मिळाल्यास यादीतून वगळले जाईल. तसेच अपुरी माहिती असेल अशा खातेदारांचे पुरावे, माहिती त्यातून उपलब्ध  होईल. चावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल,  असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.  यामुळे कर्जप्रकरणात पारदर्शिका येईल.------------------------सतर्क राहण्याचे आवाहनच्शेतकºयांच्या नावे सोसायटीचे चेअरमन आणि सचिवांनी कर्ज काढले अशा शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरून देऊ नयेत. यासंदर्भातील माहिती सहकार विभागाला द्यावी. कर्जाची रक्कम शेतकºयांनी जमा केल्यानंतर ती बँक खात्यात न भरता परस्पर वापरली असेल अथवा बेबाक दाखले देऊन शेतकºयांची बोळवण केली असेल अशा प्रकरणांची माहिती जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी स्वरुपात द्यावी किंवा चावडी वाचनात पुरवण्यात यावी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकºयांनी सतर्क राहून सहकार्य करावे, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.