शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

‘दुष्काळावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी’

By admin | Updated: April 19, 2016 04:12 IST

दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने कधीही राजकारण केले नाही. उलटपक्षी उपाययोजनांबाबत सरकारला नेहमीच विधायक सूचना केल्या

शिर्डी : दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने कधीही राजकारण केले नाही. उलटपक्षी उपाययोजनांबाबत सरकारला नेहमीच विधायक सूचना केल्या. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांचे सहकार्य हवे असल्यास त्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.दुष्काळी स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानावर विखे म्हणाले, दुष्काळाबाबत संवेदना नसलेले हे ‘सेल्फी’ सरकार आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून नागरिकांचे स्थलांतर सुरू होते, तेव्हा या सरकारच्या संवेदना कुठे होत्या, असा सवालही त्यांनी केला़ दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे़ मुख्यमंत्री आता सहकार्याची भूमिका बोलत असले तरी त्यांचा प्रयत्न कृतीत उतरत नाही. त्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून दुष्काळ उपाययोजनांवर चर्चा करावी. केंद्र सरकारकडून निधी आणण्यासाठी पंतप्रधानांकडे चला, असे आम्ही सातत्याने सरकारला सांगत आहोत. राज्याचा दबावगट निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु सरकारकडून प्रतिसादच मिळाला नाही. पाण्याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतानाही राज्य सरकारमधील मंत्र्यांची याबाबत एकवाक्यता नाही. पिण्याच्या पाण्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)