शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ओसीशिवाय मिळणार जमिनीची मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 04:26 IST

एखाद्या इमारतीतील फ्लॅट/गाळेधारकांना महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसले तरीही संबंधित जमिनीचे मालकी हस्तांतरण (डिम्ड् कन्व्हेअन्स) करता येईल.

विशेष प्रतिनिधीमुंबई : एखाद्या इमारतीतील फ्लॅट/गाळेधारकांना महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसले तरीही संबंधित जमिनीचे मालकी हस्तांतरण (डिम्ड् कन्व्हेअन्स) करता येईल. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.सदनिका असलेली इमारत (फ्लॅटस्किम) ज्या जमिनीवर उभी राहते त्या जमिनीची मालकी ही बरेचदा मूळ मालकाकडेच कायम राहते. मूळ मालक ज्या बिल्डरला जमीन फ्लॅटस्किम उभारण्यासाठी देतो तो बिल्डर मूळ बांधकाम परवानगीनुसार बरेचदा बांधकाम करीत नाही; उलट त्यात अनेक फेरफार करतो. त्यामुळे महापालिका त्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देत नाही आणि ‘ओसी’शिवाय डिम्ड् कन्व्हेअन्स न देण्याचा नियम आहे. आता ही अटच काढून घेण्यात आल्याने संबंधित जमीन ही फ्लॅट/गाळेधारकांच्या वा सोसायटीच्या नावे होण्यातील मोठा अडथळा दूर होणार आहे. राज्य सरकार मुंबईतील जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा व्यापक विचार करीतअसून, मुंबईच्या नवीन विकास आराखड्यातील विकास नियंत्रण नियमावलीत पुनर्विकासासाठी स्वतंत्र तरतूद केली जाईल. मुंबईतील विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे धोकादायक इमारतींचा कायदा राज्यभरात लागू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, नंतर उपनगर आणि एमएमआर परिसरात हा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच घरातील अंतर्गत बदलांसाठी वास्तुविशारद आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहेत. या प्रमाणपत्रानुसार इमारतीच्या उभारणीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बीम व पीलर यांना धोका पोहोचणार नसेल तर दुरुस्तीची परवानगी २४ तासांत दिली जाईल. दुरुस्ती दरम्यान इमारतीला धोका पोहोचल्यास त्याची जबाबदारी या दोघांवर राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.३० वर्षांपूर्वीच्या इमारतींंनास्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचेघाटकोपर इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन ३० वर्षांपूर्वीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ही जबाबदारी इमारतीच्या मालक व रहिवाशांची असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया आॅनलाईन केल्याने इमारतीला ३० वर्षे पुर्ण झाल्यानंतर आपोआपच तशा सूचना संबंधित इमारतींना दिल्या जाणार आहेत.स्वतंत्र विकासक नेमता येणारमुंबईतील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यात मालक चालढकल करीत असेल तर आपल्या पसंतीचा विकासक नेमून त्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा अधिकार तेथील रहिवाशांना दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.मुंबई पालिकेचीपद्धत राज्यभरमुंबई महापालिकेने इमारतींना लागणाºया परवानगीसाठी नवीन पद्धत अंमलात आणली आहे.ती अन्य महापालिकांमध्ये लागू केली जाईल. बांधकामाच्या परवानग्या तीन महिन्यांत मिळू लागल्या आहेत. पूर्वी त्यासाठी दोन वर्षे लागत असत. ओसी तर ३ ते १५ दिवसांत मिळू लागली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे कौतुक केले. हीच पद्धत इतर महापालिका आणि नगरपालिकांमध्येही लागू केली जाईल, असे ते म्हणाले. घाटकोपरच्या दुर्घटनेत अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या बचाव कार्याची त्यांनी प्रशंसा केली.