शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

CM Eknath Shinde: “अच्छा काम कर रहे हो!”; गुवाहाटीत असताना अध्यात्मिक गुरुंच्या फोनबाबत CM शिंदेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:48 IST

CM Eknath Shinde: गुवाहाटीला असताना फोन करणारे अध्यात्मिक गुरू कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुणाबाबत खुलासा केला?

CM Eknath Shinde:एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढत गेला. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करत नवीन सरकार स्थापन केले. या घडामोडींमध्ये शिंदे आणि ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. यावरून अनेकदा शिंदे गटाला लक्ष्यही केले जाते. मात्र, यातच आता गुवाहाटीला गेल्यावर काय झाले, याबाबत एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कार्यक्रमातून खुलासे करताना दिसत आहे. गुवाहाटीला असताना एका अध्यात्मिक गुरुंचा फोन आला आणि त्यांनी चांगले काम करत असल्याचे सांगत आशीर्वाद दिले. गुवाहाटीत असताना अनेकांचे आशीर्वाद लाभले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

जालन्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलेल्या फोनबाबतची आठवण सांगितली. आम्ही जेव्हा गुहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिले. मल त्यांनी फोन केला. श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणाले, अच्छा काम कर रहे हो, असे सांगतानाच बाकी मी काही बोलत नाही. सर्व तुम्हाला माहिती आहे, असे सूचक वक्तवही एकनाथ शिंदे यांनी मंचावरून केले. 

श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे 

श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे आहे. आम्ही जेव्हा दाओसला गेलो, तेव्हा १ लाख ३७ हजाराची कमाई केली. आम्ही उद्योगाला रेड कार्पेट टाकलाय. गुरुजी दाओसला देखील आले होते. त्यांनी तिथे ही आशीर्वाद दिला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकाच दिवसात अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. अडीच वर्षात सर्व सण बंद होते. आपले सरकार आले, तेव्हा पुन्हा सण-उत्सव सुरू केले, मोदी सरकारने खूप चांगले निर्णय घेतले. अर्थसंकल्पात सर्वांचा समावेश केला. अर्थसंकल्पातून सुटला असा एकही घटक नाही. मोदी सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, आता जलतारा योजना आम्ही सरकारमार्फत राबवली जाईल. जलतारा उपक्रमामुळे शेतीला फायदा होईल. बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते. त्यांनी चांगलं काम केले. शेतकऱ्यांची आत्महत्या कमी करण्याला आमचे प्राधान्य असणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जनतेचे आहे. लोकांचा विकास करणे हाच आमचा ध्यास आहे. आमचा इतर कोणताचा अजेंडा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalanaजालना