शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

CM Eknath Shinde: “अच्छा काम कर रहे हो!”; गुवाहाटीत असताना अध्यात्मिक गुरुंच्या फोनबाबत CM शिंदेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:48 IST

CM Eknath Shinde: गुवाहाटीला असताना फोन करणारे अध्यात्मिक गुरू कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुणाबाबत खुलासा केला?

CM Eknath Shinde:एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढत गेला. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करत नवीन सरकार स्थापन केले. या घडामोडींमध्ये शिंदे आणि ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. यावरून अनेकदा शिंदे गटाला लक्ष्यही केले जाते. मात्र, यातच आता गुवाहाटीला गेल्यावर काय झाले, याबाबत एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कार्यक्रमातून खुलासे करताना दिसत आहे. गुवाहाटीला असताना एका अध्यात्मिक गुरुंचा फोन आला आणि त्यांनी चांगले काम करत असल्याचे सांगत आशीर्वाद दिले. गुवाहाटीत असताना अनेकांचे आशीर्वाद लाभले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

जालन्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलेल्या फोनबाबतची आठवण सांगितली. आम्ही जेव्हा गुहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिले. मल त्यांनी फोन केला. श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणाले, अच्छा काम कर रहे हो, असे सांगतानाच बाकी मी काही बोलत नाही. सर्व तुम्हाला माहिती आहे, असे सूचक वक्तवही एकनाथ शिंदे यांनी मंचावरून केले. 

श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे 

श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे आहे. आम्ही जेव्हा दाओसला गेलो, तेव्हा १ लाख ३७ हजाराची कमाई केली. आम्ही उद्योगाला रेड कार्पेट टाकलाय. गुरुजी दाओसला देखील आले होते. त्यांनी तिथे ही आशीर्वाद दिला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकाच दिवसात अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. अडीच वर्षात सर्व सण बंद होते. आपले सरकार आले, तेव्हा पुन्हा सण-उत्सव सुरू केले, मोदी सरकारने खूप चांगले निर्णय घेतले. अर्थसंकल्पात सर्वांचा समावेश केला. अर्थसंकल्पातून सुटला असा एकही घटक नाही. मोदी सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, आता जलतारा योजना आम्ही सरकारमार्फत राबवली जाईल. जलतारा उपक्रमामुळे शेतीला फायदा होईल. बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते. त्यांनी चांगलं काम केले. शेतकऱ्यांची आत्महत्या कमी करण्याला आमचे प्राधान्य असणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जनतेचे आहे. लोकांचा विकास करणे हाच आमचा ध्यास आहे. आमचा इतर कोणताचा अजेंडा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalanaजालना