शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:25 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi Allegations:काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या डेप्युटी स्पीकर हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीच्या निकालात हेराफेरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांबाबत आक्षेप घेतला. लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राहुल गांधी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत राहुल गांधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं.

पराभव होणार असल्याने बोलायची राहुल गांधींकडून प्रॅक्टिस

"मतदार कुठून आले, मतदार याद्यांमधून कुणाची नावे काढली याची सगळी उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत. त्यामुळे त्याचे वेगळे उत्तर देण्याची काही गरज नाही. राहुल गांधी एक प्रकार कव्हर फायरिंग करत आहेत कारण त्यांनी माहिती आहे की ८ तारखेला दिल्लीच्या निकालानंतर त्यांच्या पक्षाचे दिल्लीतून अस्तित्व गायब होणार आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी काय बोलायचं याची प्रॅक्टिस राहुल गांधी करत आहेत. मी नेहमीत सांगितले आहे की, जो पर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करणार नाहीत आणि स्वतःच्या मनाला खोट्या गोष्टी सांगून स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहतील तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही. राहुल गांधींनी स्वतःच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

पत्रकार परिषदेनंतर लगेचच निवडणूक आयोगाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. "निवडणूक आयोग राजकीय पक्षांना प्राधान्य हितधारक मानतो. अर्थात मतदार हा सर्वात महत्त्वाचा असून राजकीय पक्षांकडून येणाऱ्या कल्पना, सूचना आणि प्रश्नांनाही खूप महत्त्व दिले जाते. आयोग संपूर्ण देशात एकसमानपणे स्वीकारलेल्या संपूर्ण तथ्यात्मक आकडेवारीसह लेखी प्रतिसाद देईल," असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग