शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:25 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi Allegations:काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या डेप्युटी स्पीकर हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीच्या निकालात हेराफेरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांबाबत आक्षेप घेतला. लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राहुल गांधी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत राहुल गांधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं.

पराभव होणार असल्याने बोलायची राहुल गांधींकडून प्रॅक्टिस

"मतदार कुठून आले, मतदार याद्यांमधून कुणाची नावे काढली याची सगळी उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत. त्यामुळे त्याचे वेगळे उत्तर देण्याची काही गरज नाही. राहुल गांधी एक प्रकार कव्हर फायरिंग करत आहेत कारण त्यांनी माहिती आहे की ८ तारखेला दिल्लीच्या निकालानंतर त्यांच्या पक्षाचे दिल्लीतून अस्तित्व गायब होणार आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी काय बोलायचं याची प्रॅक्टिस राहुल गांधी करत आहेत. मी नेहमीत सांगितले आहे की, जो पर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करणार नाहीत आणि स्वतःच्या मनाला खोट्या गोष्टी सांगून स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहतील तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही. राहुल गांधींनी स्वतःच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

पत्रकार परिषदेनंतर लगेचच निवडणूक आयोगाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. "निवडणूक आयोग राजकीय पक्षांना प्राधान्य हितधारक मानतो. अर्थात मतदार हा सर्वात महत्त्वाचा असून राजकीय पक्षांकडून येणाऱ्या कल्पना, सूचना आणि प्रश्नांनाही खूप महत्त्व दिले जाते. आयोग संपूर्ण देशात एकसमानपणे स्वीकारलेल्या संपूर्ण तथ्यात्मक आकडेवारीसह लेखी प्रतिसाद देईल," असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग