शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:25 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi Allegations:काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या डेप्युटी स्पीकर हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीच्या निकालात हेराफेरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांबाबत आक्षेप घेतला. लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राहुल गांधी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत राहुल गांधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं.

पराभव होणार असल्याने बोलायची राहुल गांधींकडून प्रॅक्टिस

"मतदार कुठून आले, मतदार याद्यांमधून कुणाची नावे काढली याची सगळी उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत. त्यामुळे त्याचे वेगळे उत्तर देण्याची काही गरज नाही. राहुल गांधी एक प्रकार कव्हर फायरिंग करत आहेत कारण त्यांनी माहिती आहे की ८ तारखेला दिल्लीच्या निकालानंतर त्यांच्या पक्षाचे दिल्लीतून अस्तित्व गायब होणार आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी काय बोलायचं याची प्रॅक्टिस राहुल गांधी करत आहेत. मी नेहमीत सांगितले आहे की, जो पर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करणार नाहीत आणि स्वतःच्या मनाला खोट्या गोष्टी सांगून स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहतील तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही. राहुल गांधींनी स्वतःच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

पत्रकार परिषदेनंतर लगेचच निवडणूक आयोगाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. "निवडणूक आयोग राजकीय पक्षांना प्राधान्य हितधारक मानतो. अर्थात मतदार हा सर्वात महत्त्वाचा असून राजकीय पक्षांकडून येणाऱ्या कल्पना, सूचना आणि प्रश्नांनाही खूप महत्त्व दिले जाते. आयोग संपूर्ण देशात एकसमानपणे स्वीकारलेल्या संपूर्ण तथ्यात्मक आकडेवारीसह लेखी प्रतिसाद देईल," असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग