शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या क्षणी सत्ताबदल टळला

By admin | Updated: October 7, 2014 00:52 IST

राज्यातील भाजप-शिवसेना युती व काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी मोडीत निघाल्याने जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत समीकरण बदलणार होते. परंतु पदाच्या वाटाघाटी फिस्कटल्याने अखेरच्या क्षणी सत्ताबदल टळला.

जिल्हा परिषद : सभापतिपदाच्या आग्रहात वेळ निघून गेलीनागपूर : राज्यातील भाजप-शिवसेना युती व काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी मोडीत निघाल्याने जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत समीकरण बदलणार होते. परंतु पदाच्या वाटाघाटी फिस्कटल्याने अखेरच्या क्षणी सत्ताबदल टळला. अन्यथा सत्तेत सर्वच पक्ष सहभागी असल्याचा दुर्मिळ योग घडून आला असता.जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बसपा, गोंगपा व रिपाइंला सभापतिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. सोबतच अध्यक्षपदाची संधी हुकल्याने पक्षातील नाराज सदस्यांनाही भाजप नेत्यांनी सभापतिपदाची ग्वाही दिली होती. परंतु विधानसभा निवडणुका विचारात घेता शिवसेना व भाजप नेत्यांनी गोंगपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. पक्ष सदस्यांच्या नाराजीचा विचार न करता शिवसेना-भाजप नेत्यांनी सभापतिपदी आपल्या मर्जीतील सदस्यांची वणीं लावण्याचा निर्णय घेतला. यात युतीचे संख्याबळ ३२ वरून ३० वर आले. त्यातच अंतर्गत वादात विषय समित्यांच्या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यांना २८ मते मिळाली. जेमतेम एका मताने विजय मिळवून नामुष्की टळली. सभापतिपदावरून शिवसेनेतील मतभेद पुढे आले. खासदार कृपाल तुमाने व आमदार आशिष जयस्वाल यांनी उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या कक्षात सदस्यांशी बंदद्वार चर्चा केल्यानंतरही पुष्पा देशभ्रतार व अनुराधा इंगळे यांनी बंडाचा झेंडा उगारला. देशभ्रतार यांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर इंगळे विरोधकांच्या बाजूने गेल्या. गोंगपाच्या दुर्गावती सरियाम यांना सभापतिपदासाठी दिलेला शब्द न पाळल्याने त्याही नाराज होत्या. तसेच भाजपचे केशव कुंभरे यांनीही सरियाम यांची बाजू घेत पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. नेत्यांचा आदेश झुगारून त्यांनी शिवसेनेच्या सभापतीला मतदान केले नाही. या घडामोडीत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने बहुमत झाले होते.काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रसने गोंगपा व भाजप-शिवसेनेतील नाराज सदस्यांना हाताशी धरून सत्ता बदलाची रणनीती आखली होती. त्यांचे संख्याबळ ३० पर्यंत पोहचलेही होते. परंतु काँगे्रस नेत्यांनी ऐनवेळी दोन पदासाठी आग्रह धरला. या वाटाघाटीत वेळ निघून गेल्याने समीकरण जुळताजुळता राहून गेले. दरम्यान भाजपचे उकेश चव्हाण यांना मतदान करायचे की नाही अशा संभ्रमात शिवसेनेचे सदस्य होते. सुरुवातीला शिवसेना सदस्यांनी चव्हाण यांच्या बाजूने हात उंच के ले नव्हते. परंतु निवडणूक प्रक्रि या सुरू झाल्याने विचार करण्याला वेळ नसल्याने भाजप-शिवसेना युतीचे सभापती निवडून आले. (प्रतिनिधी)