शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

भाषांच्या तोंडी परीक्षा होणार बंद

By admin | Updated: July 15, 2017 05:31 IST

गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात मिळणारे गुण पाहून अनेक तज्ज्ञ व्यक्तीही थक्क होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात मिळणारे गुण पाहून अनेक तज्ज्ञ व्यक्तीही थक्क होतात. अनेक विद्यार्थ्यांना भाषा विषयातली ९० ते ९५ गुण मिळतात. शाळेमार्फत दिल्या जाणाऱ्या २० गुणांमुळे गुणांत वाढ होते, परंतु आता इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. भाषा विषयांसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा आणि ८० गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत आता बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांचा १०० गुणांचा पेपर लिहावा लागणार आहे. शाळेकडून घेतली जाणारी २० गुणांची तोंडी परीक्षा बंद होईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठीही हाच नियम असेल. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, द्वितीय भाषांची तोंडी परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना असल्याने शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जात होते. त्यामुळे दहावीचा अंतिम निकाल फुगलेला दिसून येत होता. याचा परिणाम वाढत्या टक्केवारी स्वरुपात दिसून येत होता. याविषयी अनेक शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिक्षणमंत्र्यांनाही याची माहिती दिली होती. त्यानंतर, गेल्याच महिन्यात राज्य शिक्षण मंडळाने नववी आणि दहावीसाठी अभ्यासक्रम बदलांचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या वेळी परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले. परिपत्रकानुसार, भाषा विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर संयुक्त भाषा विषयांसाठी ५० गुण प्रत्येकी असा नवा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. या परिपत्रकात भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण कळतील, असे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. अशी होणार परीक्षा संपूर्ण भाषा विषयांसाठी १०० गुणांची, तर संयुक्त भाषा विषयांसाठी प्रत्येकी ५० गुणांची लेखी परीक्षा.गणित हा १०० गुणांचा विषय. यातील ८० गुण लेखी आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी. ८० गुणांमध्ये ४० गुण बीजगणित आणि ४० गुण भूमितीसाठी.विज्ञान-तंत्रज्ञान विषयाची २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार. ८० गुणांमध्ये भाग १ व भाग २ प्रत्येकी ४० गुणांचा.सामाजिकशास्त्रे या विषयांतर्गत इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल मिळून १०० गुण. इतिहास ४०, राज्यशास्त्र २० व भूगोल ४० अशी गुणांची विभागणी.यापुढे श्रेणी विषयांची लेखी परीक्षा होणार नाही. आरोग्य व शारीरिक शिक्षण, स्व-विकास व कलारसास्वाद, संरक्षणशास्त्र, एमसीसी हे श्रेणी विषय आहेत.