शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

  मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांचा ९ ऑगस्टला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 18:19 IST

9 ऑगस्ट रोजी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईतील डबेवाले सहभागी होणार आहेत.  डबेवाला गेली १२६ वर्ष मुंबईत काम करतो, पण काम बंद करून तो कधी धरणे, बंद, आंदोलने, मागण्या, मोर्चे यामध्ये सहभागी झाला नाही. पण मुंबईत मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्टला निघणार आहे त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी वेळ प्रसंगी कामबंद करून सहभागी होण्याचा निर्णय मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला आहे.

मुंबई, दि. 3 -  9 ऑगस्ट रोजी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईतील डबेवाले सहभागी होणार आहेत.  डबेवाला गेली १२६ वर्ष मुंबईत काम करतो, पण काम बंद करून तो कधी धरणे, बंद, आंदोलने, मागण्या, मोर्चे यामध्ये सहभागी झाला नाही. पण मुंबईत मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्टला निघणार आहे त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी वेळ प्रसंगी कामबंद करून सहभागी होण्याचा निर्णय मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला आहे. डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे,उल्हास मुके माजी अध्यक्ष यमनाजी घुले, सोपान मरे,बबनदादा वाळंज यांचे मार्गदर्शना खाली मुंबईचे डबेवाले मोर्चात सहभागी होतील.अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, स्वामिनाथन आयोग लागू करणे, चित्रपट नाटकांमधून मराठा समाजाची बदनामी थांबवणे, मराठा समाजासाठी ईबीसी सवलतीसाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाखाची करणे. व मराठा आरक्षण तात्काळ जाहीर करावे या साठी महाराष्ट्रत लाखोंचे मोर्चे निघत आहे. शेवटचा मोर्चा कदाचित मुंबईतील असण्याची शक्यता आहे. हा मोर्चा लक्षणियरित्या जागतिक विक्रम ठरण्याची शक्यता आहे.  या मुळे मुंबई आणी परिसरातील मराठा समाज ढवळून निघाला आहे.  आम्ही सर्व जाती समान मानतो. मग काही जातीना आरक्षण देऊन पुढे आणले जाते आणी आम्हा मराठ्यांना जाणीवपूर्वक मागे ठेवले जाते आहे.प्रगती,विकास,शिक्षण याच्यां संधी आम्हाला नाकारल्या जात आहेत. त्या संधी आम्हा मराठ्यांना मिळण्यासाठी "मराठा आरक्षण" मिळालेच पाहिजे, असे डबेवाल्यांनी स्पष्ट केले आहे. हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी डबेवाल्यांनी आत्ता पासूनच आखणी सुरू केली आहे. डबेवाले तर मोर्चात सहभागी होतीलच पण सोबत आपले  नातेवाईक,सगे सोयरे, आप्त,मित्र परिवार यांना ते मोर्चात सहभागी करतील.आणी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतील. आम्ही डबेवाले सुट्टी जरूर घेतो पण त्या आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी या सारख्या असतात. कारण तेव्हा आम्ही पंढरपुर, आळंदी येथे वारीला जात असतो. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी आंदोलनात सहभागी झालो होतो. पण तो दिवस सुट्टीचा होता. पण मराठा मोर्चा चा दिवस कोणताही असुद्या आम्ही सुट्टी घेऊन या मोर्चात सहभागी होणार. मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रात निघत आहे.या मोर्चाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अद्याप पर्यंत एकाही मोर्चाला सामोरे गेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना विदेशात जायला वेळ आहे. पण मराठा क्रांती मोर्चाला सामोरे जाण्यासाठी वेळ नाही. हा मोर्चा कोणाविरुद्ध नाही. मोर्चात कोणतीही घोषणाबाजी नाही. मोर्च्याला कोणतेही राजकीय नेतृत्व नाही.असे असताना देखील मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चाला सामोरे जात नाहीत. या मुळे मराठा समाजात रोष आहे व तो रोष वाढतो आहे. डबेवाल्यांचे ही मुंख्यमंत्र्यांना आवाहन आहे की ९ ऑगस्टच्या मराठा क्रांती मोर्चाला सामोरे जावे.व मोर्चाच्या ज्या काही मागण्या आहेत. त्या मान्य करून त्याची तड लावावी. असे डबेवाल्यांचे म्हणणे आहे.