शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महासत्तेकडे जाण्यासाठी प्राप्तिकर पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:55 IST

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. पुढच्या काही वर्षांत भारत महासत्ता होणार असल्याचे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात हे स्वप्न साकार करायचे असल्यास प्राप्तीकर पद्धत बंद करा, असे प्रतिपादन भाजपा नेते व खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.व्हीजेटीआय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यास आवश्यक तत्त्वे’ या विषयावर ते म्हणाले, मुळातच भारताची अधोगती ही स्वातंत्र्यापासून सुरू झाली आहे. कारण, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चुकीचेधोरण स्वीकारले. त्यांच्याधोरणामुळे आर्थिक महासत्तेकडे जाण्याची वाटचाल चुकीच्या पद्धतीने झाली.स्वतंत्र भारतात आर्थिक धोरण स्वीकारताना रशियाचा आदर्श ठेवला गेला. त्यामुळे रशियाचे आर्थिक धोरण स्वीकारून आर्थिक वाटचाल सुरू केली. रशियाचे कृषीप्रधान धोरण भारताने स्वीकारले. त्यामुळे देशात जमीनदारी पद्धत अस्तित्वात आली. याची परिणीती म्हणजे देशाला अन्नटंचाईला सामोरे जावेलागले. पण, त्यातून लाल बहादूर शास्त्री यांच्या धोरणामुळे देश बाहेर आला. त्यांनी स्वीकारलेल्या हरितक्रांती धोरणामुळे अर्थव्यवस्थेत सुस्थिती यायला लागली. आज याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत.संपूर्ण जगाला पोसायची धमक भारताकडे आहे. पण, यामुळे भारत महासत्तेकडे वाटलाच करतानाअडथळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी काही निर्णय बदलले पाहिजेत, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.>संशोधनाची गरजअमेरिकेत सातत्याने नवे संशोधन होत असते. नवनवीन उपक्रम तेथे राबविले जातात. पण, असे आपल्या देशात होताना दिसत नाही. नवीन गोष्टी करण्यासाठी भारतीय धजावत नाहीत. हे टाळण्यासाठी तरुणांनी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी