शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महासत्तेकडे जाण्यासाठी प्राप्तिकर पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:55 IST

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. पुढच्या काही वर्षांत भारत महासत्ता होणार असल्याचे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात हे स्वप्न साकार करायचे असल्यास प्राप्तीकर पद्धत बंद करा, असे प्रतिपादन भाजपा नेते व खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.व्हीजेटीआय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यास आवश्यक तत्त्वे’ या विषयावर ते म्हणाले, मुळातच भारताची अधोगती ही स्वातंत्र्यापासून सुरू झाली आहे. कारण, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चुकीचेधोरण स्वीकारले. त्यांच्याधोरणामुळे आर्थिक महासत्तेकडे जाण्याची वाटचाल चुकीच्या पद्धतीने झाली.स्वतंत्र भारतात आर्थिक धोरण स्वीकारताना रशियाचा आदर्श ठेवला गेला. त्यामुळे रशियाचे आर्थिक धोरण स्वीकारून आर्थिक वाटचाल सुरू केली. रशियाचे कृषीप्रधान धोरण भारताने स्वीकारले. त्यामुळे देशात जमीनदारी पद्धत अस्तित्वात आली. याची परिणीती म्हणजे देशाला अन्नटंचाईला सामोरे जावेलागले. पण, त्यातून लाल बहादूर शास्त्री यांच्या धोरणामुळे देश बाहेर आला. त्यांनी स्वीकारलेल्या हरितक्रांती धोरणामुळे अर्थव्यवस्थेत सुस्थिती यायला लागली. आज याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत.संपूर्ण जगाला पोसायची धमक भारताकडे आहे. पण, यामुळे भारत महासत्तेकडे वाटलाच करतानाअडथळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी काही निर्णय बदलले पाहिजेत, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.>संशोधनाची गरजअमेरिकेत सातत्याने नवे संशोधन होत असते. नवनवीन उपक्रम तेथे राबविले जातात. पण, असे आपल्या देशात होताना दिसत नाही. नवीन गोष्टी करण्यासाठी भारतीय धजावत नाहीत. हे टाळण्यासाठी तरुणांनी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी