शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तोट्यातील महामंडळे बंद करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 04:41 IST

कॅगची शिफारस : गृहमंत्री शिंदे यांनी सादर केला वित्त व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ राजकीय सोय म्हणून तोट्यातील महामंडळे, ग्रामीण बँका, संयुक्त कंपन्या, सहकारी आणि विभागीय वाणिज्यिक उपक्रम सुरू ठेवण्याबाबत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यापेक्षा ती बंद करावीत, अशी शिफारस आपल्या अहवालात केली आहे.

तसेच तोट्यातील कंपन्यांंमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावे मिळण्याची संधी दुर्लभ आहे.म्हणून सरकारने भविष्यात या कंपन्यांना समभागाऐवजी अनुदानाच्या रूपाने प्रदाने करावीत. जेणेकरून गुंतवणुकीच्या तुलनेत परताव्यामधील फरक कमी होईल, असा सल्ला कॅगने दिला आहे. विधानसभेत शुक्रवारी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅगचा राज्याच्या वित्त व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल सादर केला. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ३२ सार्वजनिक उपक्र म तोट्यात होते आणि त्यांचा निव्वळ तोटा हा ४९ हजार १९२ कोटी इतका होता, असे कॅगने म्हटले आहे. त्यामुळे या उपक्र मांचे सरकारने पुनर्विलोकन करावे, असे उपक्रम बंद करण्यासाठी अथवा त्यांच्या पुनरूज्जीवनासाठी तातडीने पावले उचलावीत. शासकीय कंपन्या, संयुक्त कंपन्या, भागीदारी आणि वैधानिक महामंडळांमधील राज्य शासनाच्या गुंतवणुकीवरील सरासरी परतावा मागील २०१३-१८ दरम्यान ०.०४ टक्के इतकाच होता. तर, शासनाने याच कालावधीत घेतलेल्या कर्जावर सरासरी ८ टक्के दराने व्याज दिले याकडे कॅगने लक्ष वेधले आहे. अशाप्रकारे, महामंडळांमधील शासनाची गुंतवणूक कशी अव्यहार्य आहे यावर कॅगने नेमके बोट ठेवले आहे. येत्या चार वर्षांत राज्याला जवळपास सव्वालाख कोटी रूपयांची परतफेड करायची आहे. तर पुढील सात वर्षांत १ कोटी ८४ लाख ३५६ म्हणजेच ५६.३७ टक्के कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. परिणामी सरकार कर्जाच्या जाळ्यात अडकू शकते, ते टाळण्यासाठी विचारपूर्वक योजना आखावी, असे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

कर्जाच्या परताव्यासाठी विचारपूर्वक योजना आखा४४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आणि २ लाख कोटींची दिलेली हमी अशा परिस्थितीत असलेल्या राज्य शासनाला कॅगच्या या अहवालात काही मोलाचे सल्ले देण्यात आले आहेत. कर्जाची परतफेड करण्यासाठी विचारपूर्वक योजना आखा. कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार नवे कर्ज घेते व त्याने बोजा अधिक वाढतो या बाबत शासनाला सचेत करण्यात आले आहे. कर्ज फेडण्यासाठी सरकार नवे कर्ज घेत असल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे. २०१३ ते १८ या दरम्यान कर्ज परतफेडीचा खर्च ३४ हजार ८९७ कोटी रूपये होता. हा खर्च ३९ हजार ६०० कोटीच्या खर्चातून भागवण्यात आला. कर्जाचा मोठा हिस्सा कर्ज चुकवण्यासाठी खर्च होतो हे स्पष्ट आहे. अशामुळे प्रगतीला चालना देण्यासाठी, विकास कामांवरील खर्च भागवण्यासाठी कर्जाचा अतिशय कमी भाग उपलब्ध होतो.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी