शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

न्यायमूर्तींची इंटरनेट सेवा बंद करा

By admin | Updated: August 11, 2015 01:46 IST

आरडीएक्सद्वारे मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, पायऱ्या झिजवाव्या लागतात.

ठाणे : आरडीएक्सद्वारे मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, पायऱ्या झिजवाव्या लागतात. याकूबसाठी पहाटे तीन वाजता सर्वोच्च न्यायालय सुनावणीला बसतात. याकूबच्या सुनावणीला २२ वर्षे आणि गणेशोत्सवातील मंडप आणि डिजेचा निर्णय एकदम झटकन? दहीहंडी म्हणे फक्त २० फूटापर्यंत बांधायची. मग ती घरातच फोडायची का, असे सवाल करुन न्यायालयांच्या निर्णयांवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. न्यायमूर्तींची वर्तमानपत्रे, नेट सर्व काढून घ्या मग पहा निर्णय कसे वेगाने होतील, असे सांगून प्रलंबित खटल्यांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. न्यायालयाचा आदर आहेच. तो घालवू नका इतकीच अपेक्षा आहे. राम जेठमलानी, नसरुदीन शहा हे याकुबची फाशी टाळण्यासाठी पत्र देतात? देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकील पत्र घेणाऱ्या जेठमलांनींना तर कधीच माफ करणार नाही. छोटा शकीलच्या मुलाखती माध्यमे देतात. याकुबने काय खाल्ले, तो काय बोलला हे सर्व प्रसिद्ध होते. हा काय तमाशा आहे, सलमान खानच्या खटल्यालाही १२ वर्षे लागली. कसले संशोधन सुरु होते, असा सवाल त्यांनी केला. आवैसी बंधूंवरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांनी जर महाराष्ट्रात वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न केला तर गाठ राज ठाकरेंशी गाठ आहे. रस्त्यावर फोडून काढेन, असा इशाराही दिला. जिथे मुख्यमंत्री राहिले त्या घरातील महिलेने आत्महत्या केली. दुष्काळ, सिंचन आणि टोलचे प्रश्न तसेच आहेत. फक्त तोंडे बदलली. साध्या अंतर्गत बदल्यांसाठी १०० कोटींचा भ्रष्टाचार. देवेंद्र फडणवीस माणूस म्हणून चांगले. पण त्यांचेही हात पाय बांधलेत. जाती पातीचेही र ाजकारण केले जातेय. त्यामुळे जाती पातीला थारा देऊ नका, मराठी आहात महाराष्ट्रासाठी झटा... जिथे जिथे मराठी माणसांवर अन्याय होईल, तिथे तिथे अन्यायाला तीव्र प्रतिकार झालाच पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यातील कार्यकर्त्यांना दिला.गडकरी रंगायतन येथे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या मेळाव्यात त्यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि न्यायालय आणि प्रसार माध्यमांचा खरपूस समाचार घेतला. तत्पूर्वी, राज यांनी गडकरी रंगायतन बाहेर सेल्फी केंद्राचे उद्घाटन केले. ते म्हणाले, मराठी राजभाषा आहे, हे ५५ वर्षांनतर सरकारला कळाले. मुंबई ठाण्यात रिक्षा चालकांसाठी नविन परमिट दिली जात असल्याचे मराठी तरुणांना माहितच नाही. यात केवळ ६० टक्के उत्तर भारतीय तर ३० ते ४० टक्के बांग्लादेशी आहेत. यांना पोसायचे काम भाजपावालेच करीत आहेत. बनावट आधारकार्ड वाटतांना एका भाजपच्याच कार्यकर्त्याला पकडल्याचा दाखलाही त्यांनी दिला. जे काँग्रेसने केले तेच भाजपवाले करताहेत. कोकणात अतिरेकी घुसल्याच्या वृत्ताचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मोदी मात्र मन की बात की मौन की बात करताहेत. मोदींनी बोलले पाहिजे की, अतिरेक्यांसदर्भात भाष्य करुन नागरिकांना भयमुक्त केले पाहिजे. ते नुसते गुजरात गुजरात जप करीत राहिले तर मग देशाचे काय होणार. (प्रतिनिधी)

मराठी मुलांनाच नोक-या.. - मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना रिक्षांचे परवानेही मिळाले पाहिजेत. यासाठी मनसेच्या वाहतूक सेनेने जागरुक राहिले पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल, मराठी माणसाला त्रास होईल, तिथे तुम्ही मशालीसारखे रहा.त्यांना आधार द्या नुसते कार्ड बनू नका असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. - मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात कंपन्या जरुर आणाव्यात पण तिथे मराठी मुलांनाच नोकऱ्या दिल्या पाहिजेत, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला. आव्हाडांचा उल्लेख वळवळया..राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच अनेक समस्या निर्माण झाल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. ९२ वर्षांच्या बाबासाहेब पुरंदरे यांचा जातीपातीच्या राजकारणात नाहक बळी घेतला जातोय. यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल समिती नेमली होती. पण यांना चर्चा नको. जातीचे विष पेरले जातेय. आधी पुरंदरेंचे नाव महाराष्ट्र भूषण म्हणून आणले जाते. नंतर त्यांच्यावर राजकारण केले जाते. राष्ट्रवादी नावाचा पक्ष आला तेंव्हापासूनच हे सर्व सुरु आहेत. शरद पवार हे कसले जाणता राजा आहेत. ज्या महाराष्ट्राने चांगला विचार दिला, तोच महाराष्ट्र जाती पातीत खितपत पडलाय. ठाण्यातले ते एक वळवळतय, असेही पुरंदरे यांच्यावर टीका करणाऱ्या आव्हाड यांचा उल्लेख केला.उद्धव आणि माझी भेट ही मिडीयाचीच बातमी...एका फार्महाऊसवर उद्धव आणि माझी भेट झाल्याची बातमी माध्यमांनीच पेरली. त्यांना पेरायला कोण लावतेय? असा सवाल करीत भाजपाला घाबरविण्यासाठी या बातम्या पसरविल्या जातायेत. राज यांचे भाषण सुरु असतांनाच ठाण्याच्या शांतीनगरच्या एका महिलेने मध्येच व्यतय आणण्याचा प्रयत्न केला. इमारती पडतायेत, पालिकेचे अधिकारी न्याय देत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या महिलेची कैफियत नंतर त्यांनी ऐकून त्यासंदर्भात शहराध्यक्ष राजेश जाधव यांना लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले.