शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंद

By admin | Updated: September 9, 2015 01:10 IST

अत्यंत धोकादायक झालेल्या गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था सुधारून तो वाहतुकीयोग्य करण्यात गेल्या सात वर्षांप्रमाणे शासनास अपयश आले आहे.

अलिबाग : अत्यंत धोकादायक झालेल्या गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था सुधारून तो वाहतुकीयोग्य करण्यात गेल्या सात वर्षांप्रमाणे शासनास अपयश आले आहे. आता यंदाही गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बंदी करून प्रवासी वाहनांकरिता आहे तो गोवा महामार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या सात वर्षांप्रमाणे अवजड वाहनांना बंदी केल्याने कोकणात जाणारा गणेशभक्त चाकरमानी जरी सुखावला असला तरी औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कच्चा माल घेऊन येणारे आणि तयार पक्का माल घेऊन जाणारे तब्बल ४ हजार ५०० मालवाहू ट्रक व अन्य अवजड वाहने बंद राहणार आहेत. यामुळे औद्योगिक कारखान्यांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन ढासळणाऱ्या अर्थकारणामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी नाराजी पसरली आहे.गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या तब्बल ६ हजार जादा एसटी बसेस मुंबई, परळ, भांडुप, घाटकोपर, नालासोपारा, ठाणे, कल्याण येथून कोकणात जाणार आहेत. ही सर्व वाहने गणेशोत्सवापूर्वीच्या पाच ते सहा दिवस आधीपासून कोकणात जाण्यास प्रारंभ करतात. मोठ्या प्रमाणातील ही वाहनसंख्या आणि गोवा महामार्गाची दुरवस्था या पार्श्वभूमीवर या महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कोकणाकडे जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना महामार्ग क्र. १७) यावर जड व अवजड वाहनांना १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. या बंदीतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल आॅक्सिजन व भाजीपाला इत्यादींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)जड वाहतुकीस बंद करण्यात आलेले मार्ग१पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ (रा.म.क्र . जुना १७) वरील पनवेल ते सिंधुदुर्गमार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गावरून होणारी १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन आहे, अशा सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारापासून १७ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.२पाच दिवसांच्या गणपती व गौरी विसर्जनानिमित्त २१ सप्टेंबरला रात्री आठ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.३१८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ (राज्य मार्ग क्र . जुना-१७ ) वर सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.४नाशिक-ठाणे राष्ट्रीय महामार्ग क्र . ३ वर १४ सप्टेंबरला चार वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना तसेच ट्रेलर, वाळू, रेती वाहतुकीचे ट्रक यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.४ हजार ५०० मालवाहू ट्रक व अवजड वाहने बंद राहणार गणेशोत्सवादरम्यानच्या मुंबई ते कोकण या वाहतुकीच्या निमित्ताने गोवा राष्ट्रीय महामार्गावर लागू करण्यात आलेल्या या अवजड वाहनांच्या बंदी निर्बंधांमुळे, कच्चा माल घेऊन येणारे व पक्का माल घेऊन जाणारे महाड-बिरवाडी एमआयडीसी क्षेत्रातील ५००च्या वर, रोहा औद्योगिक वसाहतीतील ४५०, विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील २५०, रसायनी औद्योगिक क्षेत्रातील ६००, तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ७५०, पनवेल औद्योगिक क्षेत्रातील ४५० तर रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ५५० व अन्य सुमारे ५०० अशी एकूण सुमारे साडेचार हजार अवजड वाहने या काळात बंद राहतात़ असा गेल्या चार ते पाच वर्षांतील अनुभव असून, त्याचा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या उत्पादकता आणि वितरणावर मोठा विपरीत परिणाम होतो, अशी माहिती महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विनोद देशमुख यांनी दिली आहे.थळ-वायशेत आर.सी.एफ. खत कारखाना, हिंदुस्थान पेट्रोलियम एलपीजी गॅस बॉटलिंग प्लान्ट (खानाव-अलिबाग), जेएसडब्लू इस्पात, पीएनपी पोर्ट, रिलायन्स (नागोठणे), रिलायन्स (पाताळगंगा), भूषण स्टील, उत्तम गॅल्व्हा स्टील आदी मोठे कारखाने व बंदरातील अवजड वाहनांनाही या काळात बंदी आहे.