शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंद

By admin | Updated: September 9, 2015 01:10 IST

अत्यंत धोकादायक झालेल्या गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था सुधारून तो वाहतुकीयोग्य करण्यात गेल्या सात वर्षांप्रमाणे शासनास अपयश आले आहे.

अलिबाग : अत्यंत धोकादायक झालेल्या गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था सुधारून तो वाहतुकीयोग्य करण्यात गेल्या सात वर्षांप्रमाणे शासनास अपयश आले आहे. आता यंदाही गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बंदी करून प्रवासी वाहनांकरिता आहे तो गोवा महामार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या सात वर्षांप्रमाणे अवजड वाहनांना बंदी केल्याने कोकणात जाणारा गणेशभक्त चाकरमानी जरी सुखावला असला तरी औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कच्चा माल घेऊन येणारे आणि तयार पक्का माल घेऊन जाणारे तब्बल ४ हजार ५०० मालवाहू ट्रक व अन्य अवजड वाहने बंद राहणार आहेत. यामुळे औद्योगिक कारखान्यांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन ढासळणाऱ्या अर्थकारणामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी नाराजी पसरली आहे.गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या तब्बल ६ हजार जादा एसटी बसेस मुंबई, परळ, भांडुप, घाटकोपर, नालासोपारा, ठाणे, कल्याण येथून कोकणात जाणार आहेत. ही सर्व वाहने गणेशोत्सवापूर्वीच्या पाच ते सहा दिवस आधीपासून कोकणात जाण्यास प्रारंभ करतात. मोठ्या प्रमाणातील ही वाहनसंख्या आणि गोवा महामार्गाची दुरवस्था या पार्श्वभूमीवर या महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कोकणाकडे जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना महामार्ग क्र. १७) यावर जड व अवजड वाहनांना १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. या बंदीतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल आॅक्सिजन व भाजीपाला इत्यादींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)जड वाहतुकीस बंद करण्यात आलेले मार्ग१पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ (रा.म.क्र . जुना १७) वरील पनवेल ते सिंधुदुर्गमार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गावरून होणारी १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन आहे, अशा सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारापासून १७ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.२पाच दिवसांच्या गणपती व गौरी विसर्जनानिमित्त २१ सप्टेंबरला रात्री आठ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.३१८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ (राज्य मार्ग क्र . जुना-१७ ) वर सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.४नाशिक-ठाणे राष्ट्रीय महामार्ग क्र . ३ वर १४ सप्टेंबरला चार वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना तसेच ट्रेलर, वाळू, रेती वाहतुकीचे ट्रक यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.४ हजार ५०० मालवाहू ट्रक व अवजड वाहने बंद राहणार गणेशोत्सवादरम्यानच्या मुंबई ते कोकण या वाहतुकीच्या निमित्ताने गोवा राष्ट्रीय महामार्गावर लागू करण्यात आलेल्या या अवजड वाहनांच्या बंदी निर्बंधांमुळे, कच्चा माल घेऊन येणारे व पक्का माल घेऊन जाणारे महाड-बिरवाडी एमआयडीसी क्षेत्रातील ५००च्या वर, रोहा औद्योगिक वसाहतीतील ४५०, विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील २५०, रसायनी औद्योगिक क्षेत्रातील ६००, तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ७५०, पनवेल औद्योगिक क्षेत्रातील ४५० तर रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ५५० व अन्य सुमारे ५०० अशी एकूण सुमारे साडेचार हजार अवजड वाहने या काळात बंद राहतात़ असा गेल्या चार ते पाच वर्षांतील अनुभव असून, त्याचा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या उत्पादकता आणि वितरणावर मोठा विपरीत परिणाम होतो, अशी माहिती महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विनोद देशमुख यांनी दिली आहे.थळ-वायशेत आर.सी.एफ. खत कारखाना, हिंदुस्थान पेट्रोलियम एलपीजी गॅस बॉटलिंग प्लान्ट (खानाव-अलिबाग), जेएसडब्लू इस्पात, पीएनपी पोर्ट, रिलायन्स (नागोठणे), रिलायन्स (पाताळगंगा), भूषण स्टील, उत्तम गॅल्व्हा स्टील आदी मोठे कारखाने व बंदरातील अवजड वाहनांनाही या काळात बंदी आहे.