शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

माथेरानमधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता

By admin | Updated: July 14, 2017 03:19 IST

गेली अनेक वर्षे जीवन प्राधिकरणाने पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई न केल्यामुळे गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : गेली अनेक वर्षे जीवन प्राधिकरणाने पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई न केल्यामुळे गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तत्काळ फिल्टर हाऊस येथील पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई सुरू केली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा करते. पाऊस जास्त पडल्याने जमिनीची धूप होऊन चिखलमय पाणी माथेरानच्या शार्लोट तलावात जाते तिथून ते पाणी फिल्टर हाऊस येथे टाक्यांमध्ये साठविले जाते. त्याच टाक्यातील गढूळ पाणी जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचते, तसेच गेली कित्येक वर्षे या टाक्या साफ न केल्यामुळे टाक्यांमध्ये चिखल साचला होता त्यामुळे माथेरानकरांना २० दिवस गढूळ पाणी येत होते. अखेर जीवन प्राधिकरणाने या टाक्यांच्या सफाईला प्रारंभ केला आहे. त्यामुळे माथेरानकरांना एक दिवसआड पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात येतआहे.पूर्वी आलम आणि वाळूमधून पाणी शुद्ध केले जायचे, परंतु वाळू खराब झाल्यामुळे ते जलशुद्धीकरण क्लोरीनवर केले जात होते, परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याने पुन्हा वाळूमधूनच जल शुद्धीकरण केले जाणार आहे. यासाठी आम्ही गुजरातहून खास वाळू आणली आहे आणि लवकरच त्याचे सुद्धा काम पूर्ण करून माथेरानला शुद्ध पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.>माथेरानला जोरदार पावसामुळे तलावामधील चिखलयुक्त पाणी पाइपमध्ये गेल्यामुळे माथेरानकरांना गढूळ पाणी मिळत होते. यासाठी आम्ही सर्व फिल्टर टाक्या सफाई करण्यास सुरु वात केली आहे. एप्रिल व मे महिन्यात टाक्या साफ करू शकत नाही कारण त्यावेळी माथेरानला पर्यटन हंगाम असतो, थोडा पाऊस झाल्यानंतर आम्ही टाक्या साफ करावयास घेतल्या आहेत. त्यासाठी काही दिवस माथेरानकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन फलकाद्वारे माथेरानच्या बाजारपेठेत करण्यात आले आहे.-किरण शानबाग, शाखाधिकारी, माथेरानगढूळ पाण्याची समस्या माथेरानकरांना नवीन नाही, प्रत्येक पावसात सुरु वातीला गढूळ पाणी येते. दरवर्षी पावसाळा संपल्यावर माथेरानमधील जनतेला क्लोरीनची बॉटल मिळायची, परंतु यावेळेला आम्ही नगरपरिषदेच्या माध्यमातून जून महिन्यातच प्रत्येक घरात क्लोरीन बॉटल पोहोच केली आहे, तसेच गढूळ पाण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दोन वेळा पत्रव्यवहार करून नगरपरिषदेमार्फत विचारणा करण्यात आली आहे.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा