शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

माथेरानमधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता

By admin | Updated: July 14, 2017 03:19 IST

गेली अनेक वर्षे जीवन प्राधिकरणाने पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई न केल्यामुळे गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : गेली अनेक वर्षे जीवन प्राधिकरणाने पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई न केल्यामुळे गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तत्काळ फिल्टर हाऊस येथील पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई सुरू केली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा करते. पाऊस जास्त पडल्याने जमिनीची धूप होऊन चिखलमय पाणी माथेरानच्या शार्लोट तलावात जाते तिथून ते पाणी फिल्टर हाऊस येथे टाक्यांमध्ये साठविले जाते. त्याच टाक्यातील गढूळ पाणी जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचते, तसेच गेली कित्येक वर्षे या टाक्या साफ न केल्यामुळे टाक्यांमध्ये चिखल साचला होता त्यामुळे माथेरानकरांना २० दिवस गढूळ पाणी येत होते. अखेर जीवन प्राधिकरणाने या टाक्यांच्या सफाईला प्रारंभ केला आहे. त्यामुळे माथेरानकरांना एक दिवसआड पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात येतआहे.पूर्वी आलम आणि वाळूमधून पाणी शुद्ध केले जायचे, परंतु वाळू खराब झाल्यामुळे ते जलशुद्धीकरण क्लोरीनवर केले जात होते, परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याने पुन्हा वाळूमधूनच जल शुद्धीकरण केले जाणार आहे. यासाठी आम्ही गुजरातहून खास वाळू आणली आहे आणि लवकरच त्याचे सुद्धा काम पूर्ण करून माथेरानला शुद्ध पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.>माथेरानला जोरदार पावसामुळे तलावामधील चिखलयुक्त पाणी पाइपमध्ये गेल्यामुळे माथेरानकरांना गढूळ पाणी मिळत होते. यासाठी आम्ही सर्व फिल्टर टाक्या सफाई करण्यास सुरु वात केली आहे. एप्रिल व मे महिन्यात टाक्या साफ करू शकत नाही कारण त्यावेळी माथेरानला पर्यटन हंगाम असतो, थोडा पाऊस झाल्यानंतर आम्ही टाक्या साफ करावयास घेतल्या आहेत. त्यासाठी काही दिवस माथेरानकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन फलकाद्वारे माथेरानच्या बाजारपेठेत करण्यात आले आहे.-किरण शानबाग, शाखाधिकारी, माथेरानगढूळ पाण्याची समस्या माथेरानकरांना नवीन नाही, प्रत्येक पावसात सुरु वातीला गढूळ पाणी येते. दरवर्षी पावसाळा संपल्यावर माथेरानमधील जनतेला क्लोरीनची बॉटल मिळायची, परंतु यावेळेला आम्ही नगरपरिषदेच्या माध्यमातून जून महिन्यातच प्रत्येक घरात क्लोरीन बॉटल पोहोच केली आहे, तसेच गढूळ पाण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दोन वेळा पत्रव्यवहार करून नगरपरिषदेमार्फत विचारणा करण्यात आली आहे.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा