शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता

By admin | Updated: July 14, 2017 03:19 IST

गेली अनेक वर्षे जीवन प्राधिकरणाने पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई न केल्यामुळे गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : गेली अनेक वर्षे जीवन प्राधिकरणाने पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई न केल्यामुळे गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तत्काळ फिल्टर हाऊस येथील पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई सुरू केली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा करते. पाऊस जास्त पडल्याने जमिनीची धूप होऊन चिखलमय पाणी माथेरानच्या शार्लोट तलावात जाते तिथून ते पाणी फिल्टर हाऊस येथे टाक्यांमध्ये साठविले जाते. त्याच टाक्यातील गढूळ पाणी जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचते, तसेच गेली कित्येक वर्षे या टाक्या साफ न केल्यामुळे टाक्यांमध्ये चिखल साचला होता त्यामुळे माथेरानकरांना २० दिवस गढूळ पाणी येत होते. अखेर जीवन प्राधिकरणाने या टाक्यांच्या सफाईला प्रारंभ केला आहे. त्यामुळे माथेरानकरांना एक दिवसआड पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात येतआहे.पूर्वी आलम आणि वाळूमधून पाणी शुद्ध केले जायचे, परंतु वाळू खराब झाल्यामुळे ते जलशुद्धीकरण क्लोरीनवर केले जात होते, परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याने पुन्हा वाळूमधूनच जल शुद्धीकरण केले जाणार आहे. यासाठी आम्ही गुजरातहून खास वाळू आणली आहे आणि लवकरच त्याचे सुद्धा काम पूर्ण करून माथेरानला शुद्ध पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.>माथेरानला जोरदार पावसामुळे तलावामधील चिखलयुक्त पाणी पाइपमध्ये गेल्यामुळे माथेरानकरांना गढूळ पाणी मिळत होते. यासाठी आम्ही सर्व फिल्टर टाक्या सफाई करण्यास सुरु वात केली आहे. एप्रिल व मे महिन्यात टाक्या साफ करू शकत नाही कारण त्यावेळी माथेरानला पर्यटन हंगाम असतो, थोडा पाऊस झाल्यानंतर आम्ही टाक्या साफ करावयास घेतल्या आहेत. त्यासाठी काही दिवस माथेरानकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन फलकाद्वारे माथेरानच्या बाजारपेठेत करण्यात आले आहे.-किरण शानबाग, शाखाधिकारी, माथेरानगढूळ पाण्याची समस्या माथेरानकरांना नवीन नाही, प्रत्येक पावसात सुरु वातीला गढूळ पाणी येते. दरवर्षी पावसाळा संपल्यावर माथेरानमधील जनतेला क्लोरीनची बॉटल मिळायची, परंतु यावेळेला आम्ही नगरपरिषदेच्या माध्यमातून जून महिन्यातच प्रत्येक घरात क्लोरीन बॉटल पोहोच केली आहे, तसेच गढूळ पाण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दोन वेळा पत्रव्यवहार करून नगरपरिषदेमार्फत विचारणा करण्यात आली आहे.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा