शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महाराष्ट्रासह अकरा राज्यात स्वच्छता मोहीम

By admin | Updated: March 2, 2017 05:13 IST

महाराष्ट्रासह देशभरातील ११ राज्यातील तब्बल ३ हजार २७१ ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : ज्येष्ठ निरूपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १ मार्च या जयंती दिनी, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील ११ राज्यातील तब्बल ३ हजार २७१ ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात राज्यात तब्बल ३ लाखांपेक्षा अधिक बैठक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभागी होऊन सद्गुरूंना आदरांजली अर्पण केली आहे.डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख व राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या संपूर्ण नियोजनातून साकारलेल्या या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ रेवदंडा येथे निरूपणकार सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी करण्यात आला. ५३ जिल्ह्यातील १७९ तालुकास्तराच्या शहरांमध्ये तर ५४६ गावांमध्ये बुधवारी स्वयंसेवक सकाळी ७ वाजल्यापासून सक्रिय कार्यरत झाले होते. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या स्वच्छता अभियानात २७८७ टन सुका कचरा तर ९८८९ टन ओला कचरा संकलित करण्यात आला. या संकलित कचऱ्याची सुयोग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याकरिता स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.स्वच्छता अभियानात ४ हजार २८३ किमी अंतराचे रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले, तर २५.७५ किमी अंतराचे समुद्र किनारे कचरामुक्त करण्यात आले आहेत. ११५ रेल्वे स्थानकांची स्वच्छता देखील या अभियानांतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व दिल्ली या राज्यांमध्येही स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित देशव्यापी स्वच्छता मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली होती. या वेळी पुन्हा या अभियानाची नोंद घ्यावी लागेल असे अभियान स्वच्छता सहभागातून संपन्न झाले आहे. (विशेष प्रतिनिधी)ज्येष्ठ निरूपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनी, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियानाचा रेवदंडा येथे शुभारंभ झाला. त्या वेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी निरूपणकार सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी.>115 रेल्वे स्थानकांची स्वच्छता देखील या अभियानांतर्गत करण्यात आली आहे.