शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

राजगुरुनगरला लवकरच शुद्ध पाणी

By admin | Updated: July 20, 2016 01:00 IST

केदारेश्वर बंधाऱ्यात सांडपाणी येऊ नये म्हणून त्याला बायपास करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या सिमेंट पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आले

राजगुरुनगर : येथील भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात सांडपाणी येऊ नये म्हणून त्याला बायपास करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या सिमेंट पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत बिडाची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांत सांडपाण्याचा अंश नसलेले शुद्ध पाणी राजगुरुनगरला मिळणार आहे. राजगुरुनगर नगर परिषदेने नुकतेच जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण करून शुद्ध पाणी गावाला देण्यास सुरुवात केलेली आहे. पण केंद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत हे पाणी वाहून नेणारी जुनी पाइपलाइन सतत फुटत होती. त्यामुळे पुरेसे शुद्ध पाणी गावाला मिळत नव्हते. तसेच सांडपाणी बंधाऱ्यात येत असल्याने त्याचाही काही अंश पाण्यात राहत होता. आता या दोन्ही समस्या सुटण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याने नागरिकांना खऱ्या अर्थाने शुद्ध पाणी मिळणार आहे. राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यात येणारे सांडपाणी थांबविण्याचा निर्णय राजगुरुनगर नगर परिषदेने मे महिन्यात घेतला होता. त्यानुसार हे पाणी बाजूने काढून देण्याच्या कामासाठी ३१ लाखांची निविदा मंजूर झाली होती. प्रत्यक्ष कामाला सुरुवातही मे महिन्यात झाली. राजगुरुनगरच्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाणी गावाच्या पाणीयोजनेसाठी वापरले जाते. या बंधाऱ्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे ते नेहमीच खराब होत होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजगुरुनगरकर दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त होते. पावसाळ्यात गढूळ पाणी आणि उन्हाळ्यात वास मारणारे काळपट पाणी अशी अवस्था होती. पाणी अशुद्ध होण्याचे मुख्य कारण बंधाऱ्यात येणारे सांडपाणी होते. हे कारणच समूळ नष्ट करण्यासाठी, ज्या झुरीतून गृहप्रकल्पांचे पाणी केदारेश्वर बंधाऱ्यात येते, तो प्रवाह बंधाऱ्याच्या बाजूने मोठे पाइप टाकून बंधाऱ्यापुढे आणून सोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)