शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राजगुरुनगरला लवकरच शुद्ध पाणी

By admin | Updated: July 20, 2016 01:00 IST

केदारेश्वर बंधाऱ्यात सांडपाणी येऊ नये म्हणून त्याला बायपास करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या सिमेंट पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आले

राजगुरुनगर : येथील भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात सांडपाणी येऊ नये म्हणून त्याला बायपास करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या सिमेंट पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत बिडाची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांत सांडपाण्याचा अंश नसलेले शुद्ध पाणी राजगुरुनगरला मिळणार आहे. राजगुरुनगर नगर परिषदेने नुकतेच जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण करून शुद्ध पाणी गावाला देण्यास सुरुवात केलेली आहे. पण केंद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत हे पाणी वाहून नेणारी जुनी पाइपलाइन सतत फुटत होती. त्यामुळे पुरेसे शुद्ध पाणी गावाला मिळत नव्हते. तसेच सांडपाणी बंधाऱ्यात येत असल्याने त्याचाही काही अंश पाण्यात राहत होता. आता या दोन्ही समस्या सुटण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याने नागरिकांना खऱ्या अर्थाने शुद्ध पाणी मिळणार आहे. राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यात येणारे सांडपाणी थांबविण्याचा निर्णय राजगुरुनगर नगर परिषदेने मे महिन्यात घेतला होता. त्यानुसार हे पाणी बाजूने काढून देण्याच्या कामासाठी ३१ लाखांची निविदा मंजूर झाली होती. प्रत्यक्ष कामाला सुरुवातही मे महिन्यात झाली. राजगुरुनगरच्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाणी गावाच्या पाणीयोजनेसाठी वापरले जाते. या बंधाऱ्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे ते नेहमीच खराब होत होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजगुरुनगरकर दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त होते. पावसाळ्यात गढूळ पाणी आणि उन्हाळ्यात वास मारणारे काळपट पाणी अशी अवस्था होती. पाणी अशुद्ध होण्याचे मुख्य कारण बंधाऱ्यात येणारे सांडपाणी होते. हे कारणच समूळ नष्ट करण्यासाठी, ज्या झुरीतून गृहप्रकल्पांचे पाणी केदारेश्वर बंधाऱ्यात येते, तो प्रवाह बंधाऱ्याच्या बाजूने मोठे पाइप टाकून बंधाऱ्यापुढे आणून सोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)