शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘अधुरेच’

By admin | Updated: March 5, 2016 02:15 IST

पनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ३० नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अभियान राबविताना शासनाच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे.

नामदेव मोरे,  नवी मुबईपनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ३० नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अभियान राबविताना शासनाच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस श्रमदान अभियान राबविणे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह पालिकेच्या प्रत्येक सभेत कामाचा आढावा सादर केला जात नाही.राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून पनवेलची ओळख आहे. परंतु पहिले हागणदारीमुक्त शहर बनविण्यास येथील प्रशासनास अपयश आले आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीमध्ये शहरात फक्त ५१ ठिकाणी शौचालये उभारण्यात आली आहेत. केंद्र शासनाने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये शहरात ४३,४४६ घरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील ३७,६५३ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय आहे. ४,८१३ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय नाही. या अहवालाप्रमाणे ३,९१७ कुटुुंबातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था असून, १,१२७ घरातील नागरिकांना अद्याप उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पालिकेच्या २०१४च्या शहर स्वच्छता आराखड्याप्रमाणे ४०,९७७ घरांमध्ये शौचालय असून ४,३१० घरांमध्ये ही सुविधा नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक नगरपालिकेने सार्वजनिक प्रसाधनगृहांची उभारणी व देखभाल याकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही. यामुळे शहराची लोकसंख्या १ लाख ८० हजार झाल्यानंतर व या ठिकाणी रोज हजारो नागरिक कामानिमित्त येत असताना त्यांच्यासाठी पुरेशी प्रसाधनगृह उभारण्यात अपयश आले आहे. मार्केट, बसस्टॉप व इतर महत्त्वाच्या ठिकाणीही नागरिकांसाठी ही सुविधा नाही. शहरात झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची संख्या ९ हजारांपेक्षा जास्त आहे. याशिवाय बेघर नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून या सर्वांसाठी फक्त ३६१ सीट्सच उपलब्ध आहेत. ३,९१७ कुटुंबांतील सदस्य सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत असल्याचा दावा केला आहे. परंतू वास्तवात हा आकडा योग्य नसल्याचे बोलले जात आहे. शहरात पालिकेने बांधलेल्या अनेक शौचालयांची अवस्था बिकट आहे. शिवाजी चौकामध्ये महिलांच्या शौचालयामध्ये पुरुषांचा वावर असल्याचे अनेक वेळा पाहावयास मिळाले आहे. पालिकेतील राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते शिवदास कांबळे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना या विषयाकडे लक्ष वेधले होते.३० ठिकाणी शौचालये !नगरपालिकेने शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. या अभियानाअंतर्गत जवळपास ३० ठिकाणी शौचालये बांधली जाणार आहेत. यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. परंतु या अभियानामध्ये फक्त शौचालय उभारणे अभिप्रेत नाही. घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यावरही लक्ष देण्याच्या सूचना आहेत. स्वच्छतादूतांचा वापर करणेसिन्नरमधील सुवर्णा लोखंडे, वाशीममधील संगीता आव्हाडे व यवतमाळमधील चैताली राठोड या महिलांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शौचालय उभारल्यामुळे शासनाने त्यांना स्वच्छतादूत म्हणून घोषित केले आहे. नगरपालिकेने जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये या स्वच्छतादूतांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु या सूचनांचेही योग्यपद्धतीने पालन केले जात नाही.नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक शौचालये नाहीत. जी आहेत त्यांची स्थितीही बिकट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानामधील अनेक सूचनांचे पालन केले जात नाही. शहरात स्वच्छतादूतांची घोषणाही केली जात नाही. प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या सुविधेसाठी योग्य त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असावे व त्याच्या देखभालीची यंत्रणा निर्माण करावी यासाठी पाठपुरावा करत आहोत. -शिवदास कांबळे, गटनेते व शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी> अभियानासाठी शासनाच्या सूचना प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस श्रमदान मोहीम राबविण्यात यावी.अभियानात सहभागी झालेले नगरसेवक, नागरिक, संस्था यांची नोंद ठेवण्यात यावीश्रमदान मोहिमेची छायाचित्र काढण्यात यावीत.पालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत अभियानाच्या कामाचा आढावा सादर करावा. श्रमदानामध्ये सहभागी नागरिक व त्यांनी केलेल्या कामांच्या तपशिलाची नोंद ठेवावी.शहरातील ओल्या - सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.