शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आघाडीची घाण स्वच्छ करा

By admin | Updated: October 10, 2014 22:57 IST

देवेंद्र फडणवीस : चिखलीत भाजपची प्रचारसभा

गुहागर : भारत स्वच्छ होण्यासाठी प्रत्येक भारतीय सहभागी झाला पाहिजे. यासाठी सर्व राज्ये स्वच्छ झाली पाहिजेत. महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची घाण स्वच्छ करावी लागेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. -भाजपचे उमेदवार डॉ. विनय नातू यांच्या प्रचारार्थ चिखली येथील सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश प्रगतीच्या वाटेवर आहे. मोदींनी चीन, अमेरिका, जपान दौरे केले. याआधी अमेरिकेच्या आदेशावर पंतप्रधान मान डोलवायचे. मोदी अमेरिकेमध्ये याचक म्हणून नाही तर शासक म्हणून गेले. अमेरिकेत जाऊन ते केवळ भारताचे नाहीत जगाचे नेते आहेत, असा उल्लेख तेथील प्रसार माध्यमातून झाला.काँग्रेस जाहिरातीतून महाराष्ट्र पहिला असल्याचे सांगत आहे, पण मागून की पुढून हे विचारण्याची गरज आहे. कारण सर्वाधिक ७ हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. सर्वाधिक महिलांवर बलात्कार, अत्याचार महाराष्ट्रात होतात. ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. ७० हजार कोटी खर्चून एक टक्का ही सिंचन क्षमता वाढली नाही. एवढे पैसे खर्चूनही कोणताच विकास झाला नाही मग हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न त्यांनी केला.महाराष्ट्रातील ५० टक्के तरुण २५ वर्षाच्या आतील आहेत. शिक्षण व्यवस्था कमकुवत आहे. देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असताना या तरुणांना दर्जात्मक शिक्षणाारोार कौश"य देणे ही आवश्यक आहे. अन्यथा समोर रोजगार असूनही त्यासाठी आवश्यक पात्रता तरुणांमध्ये नसेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असल्याचे त्यांनी सांगितले. १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळचे किती कार्यकर्ते आजच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, असा सवाल विनय नातूंनी विचारला. आघाडी सरकारच्या १०२ घोटाळ्यानंतर येथील घरेलू कामगार योजनेचा १०३ वा घोटाळा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)