शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

‘स्वच्छ भारत’ केवळ घोषणाच !

By admin | Updated: April 13, 2016 03:51 IST

पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना

मुंबई : पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना आणि दूरदृष्टीचा अभाव आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेला देवनार कचरा डेपो शहराबाहेर हलविण्याची मागणीही त्यांनी केली.देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या धुराने अवघी मुंबई त्रस्त झाली असतानाच मंगळवारी राहुल गांधी यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन या ‘ज्वलंत’ प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. राहुल येणार म्हणून सकाळपासून कार्यकर्त्यांसह रहिवाशांची गर्दी झाली होती. सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांनी तेथील रहिवाशांना आत जाण्यास मज्जाव केल्याने त्यांचा हिरमोड झाला. नागरिकांशी संवाद साधता न आल्याची खंत राहुल यांनीही बोलून दाखवली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, आमदार वर्षा गायकवाड, माजी आमदार कृपाशंकर सिंग, मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि चंद्रकांत हंडोरे आदी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)देवनार डम्पिंगचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. चेंबूर सिटीझन संस्थेचे २ पदाधिकारी मला भेटले. देवनारचा प्रश्न मांडताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. येथील धुरामुळे एका लहानग्याला जीव गमवावा लागला, हे वाईट आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांना हे दिसत नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने हे डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविले पाहिजे. - राहुल गांधीमास्कविनाच डम्पिंगची पाहणी : देवनार डम्पिंग भेटीवेळी कोणालाही येथील दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून उपस्थित प्रत्येकाला तोंडाला लावण्यास मास्क देण्यात आले. पोलिसांसह पालिकेचे कर्मचारी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी तोंडाला मास्क लावूनही घेतले. परंतु अगदी साध्या वेशात म्हणजे निळी जीन्स आणि पांढऱ्या सदऱ्यात दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी मास्कविना डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली.छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे षड्यंत्रसराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा अबकारी कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. बड्या उद्योजकांसाठी सरकार छोट्या सराफांसह कारागिरांनी चिरडू पाहत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.