शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

‘स्वच्छ भारत’ केवळ घोषणाच !

By admin | Updated: April 13, 2016 03:51 IST

पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना

मुंबई : पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना आणि दूरदृष्टीचा अभाव आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेला देवनार कचरा डेपो शहराबाहेर हलविण्याची मागणीही त्यांनी केली.देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या धुराने अवघी मुंबई त्रस्त झाली असतानाच मंगळवारी राहुल गांधी यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन या ‘ज्वलंत’ प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. राहुल येणार म्हणून सकाळपासून कार्यकर्त्यांसह रहिवाशांची गर्दी झाली होती. सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांनी तेथील रहिवाशांना आत जाण्यास मज्जाव केल्याने त्यांचा हिरमोड झाला. नागरिकांशी संवाद साधता न आल्याची खंत राहुल यांनीही बोलून दाखवली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, आमदार वर्षा गायकवाड, माजी आमदार कृपाशंकर सिंग, मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि चंद्रकांत हंडोरे आदी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)देवनार डम्पिंगचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. चेंबूर सिटीझन संस्थेचे २ पदाधिकारी मला भेटले. देवनारचा प्रश्न मांडताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. येथील धुरामुळे एका लहानग्याला जीव गमवावा लागला, हे वाईट आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांना हे दिसत नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने हे डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविले पाहिजे. - राहुल गांधीमास्कविनाच डम्पिंगची पाहणी : देवनार डम्पिंग भेटीवेळी कोणालाही येथील दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून उपस्थित प्रत्येकाला तोंडाला लावण्यास मास्क देण्यात आले. पोलिसांसह पालिकेचे कर्मचारी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी तोंडाला मास्क लावूनही घेतले. परंतु अगदी साध्या वेशात म्हणजे निळी जीन्स आणि पांढऱ्या सदऱ्यात दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी मास्कविना डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली.छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे षड्यंत्रसराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा अबकारी कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. बड्या उद्योजकांसाठी सरकार छोट्या सराफांसह कारागिरांनी चिरडू पाहत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.