शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

‘स्वच्छ भारत’ केवळ घोषणाच !

By admin | Updated: April 13, 2016 03:51 IST

पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना

मुंबई : पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना आणि दूरदृष्टीचा अभाव आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेला देवनार कचरा डेपो शहराबाहेर हलविण्याची मागणीही त्यांनी केली.देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या धुराने अवघी मुंबई त्रस्त झाली असतानाच मंगळवारी राहुल गांधी यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन या ‘ज्वलंत’ प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. राहुल येणार म्हणून सकाळपासून कार्यकर्त्यांसह रहिवाशांची गर्दी झाली होती. सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांनी तेथील रहिवाशांना आत जाण्यास मज्जाव केल्याने त्यांचा हिरमोड झाला. नागरिकांशी संवाद साधता न आल्याची खंत राहुल यांनीही बोलून दाखवली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, आमदार वर्षा गायकवाड, माजी आमदार कृपाशंकर सिंग, मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि चंद्रकांत हंडोरे आदी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)देवनार डम्पिंगचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. चेंबूर सिटीझन संस्थेचे २ पदाधिकारी मला भेटले. देवनारचा प्रश्न मांडताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. येथील धुरामुळे एका लहानग्याला जीव गमवावा लागला, हे वाईट आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांना हे दिसत नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने हे डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविले पाहिजे. - राहुल गांधीमास्कविनाच डम्पिंगची पाहणी : देवनार डम्पिंग भेटीवेळी कोणालाही येथील दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून उपस्थित प्रत्येकाला तोंडाला लावण्यास मास्क देण्यात आले. पोलिसांसह पालिकेचे कर्मचारी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी तोंडाला मास्क लावूनही घेतले. परंतु अगदी साध्या वेशात म्हणजे निळी जीन्स आणि पांढऱ्या सदऱ्यात दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी मास्कविना डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली.छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे षड्यंत्रसराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा अबकारी कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. बड्या उद्योजकांसाठी सरकार छोट्या सराफांसह कारागिरांनी चिरडू पाहत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.