शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कलंकित मंत्र्यासाठी ‘क्लीन चिट’ योजना

By admin | Updated: July 23, 2016 02:16 IST

अवघ्या २० महिन्यांत २० मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात फसले असून, सरकारने विश्वासार्हता गमावली आहे.

मुंबई : अवघ्या २० महिन्यांत २० मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात फसले असून, सरकारने विश्वासार्हता गमावली आहे. भ्रष्ट मंत्र्याना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट एक खिडकी योजना’ आणि ‘गुन्हे माफ योजना’ सुरू करावी, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी फडणवीस सरकारचा समाचार घेतला. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षांनी नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला विखे-पाटील यांनी सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी अनेक मंत्र्यांवर पुराव्यांसह थेट आरोप केले. आरोग्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच दलित समाजाबद्दल डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच अवमानजनक विधान केले होते. जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. नाशिकपासून नेरूळपर्यंत पोलिसांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चव्हाणांची नेमकी कोणती कामगिरी पाहून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला, अशी विचारणा विखे यांनी केली. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, कामगार मंत्री संभाजीराव पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर असलेल्या आरोपांची जंत्रीच विखे यांनी यावेळी सादर केली.एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीत मूलभूत प्रश्नांची उत्तरेच मिळालेली नाहीत. तरीही त्यांना क्लीन चिट दिल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या काळातील औषध खरेदी घोटाळ्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आरोग्य मंत्र्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्या खासगी सचिवापासून चालकापर्यंत संपूर्ण कर्मचारीवर्ग त्यांना सोडून गेला आहे. यासोबतच त्यांनी इतरही अनेक मंत्र्यांच्या विविध प्रकरणांचा उल्लेख करून, असेच सुरू राहिल्यास मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील कागदपत्रांच्या प्रदर्शनासाठी गांधी भवन सभागृहाऐवजी पुढील वेळी ते वानखेडे स्टेडियमवर हे प्रदर्शन भरवावे लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)>निकष काय आहेत?गेल्या दोन वर्षांत मंत्रिमंडळात समावेश करताना निकष काय आहे? जास्त बदनामी हा आहे की की ओरिजनल असणे, हे आधी स्पष्ट करायला हवे. ओरिजनलवर कितीही आरोप झाले, भ्रष्टाचार केला, तरीही त्याची वर्णी लावली जात आहे. यामुळे आमच्यातून तिकडे गेलेल्या विजय गावित, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर यांचा मंत्रिमंडळात नंबर लागला नाही. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांना असा धक्का दिला जातो की ते थेट चौथ्या रांगेत जातात, असे खडसे यांच्याकडे पाहात जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला.