शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

लग्नातील अहेराच्या पैशांतून बांधल्या वर्गखोल्या

By admin | Updated: July 14, 2017 05:02 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी दोन वर्गखोल्या बांधून ठाणे येथील शिर्वन व सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : लग्नात मिळालेल्या अहेराच्या रकमेतून वाडा तालुक्यातील नांदणी गायगोठा (कळंभई) येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी दोन वर्गखोल्या बांधून ठाणे येथील शिर्वन व सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे.शिर्वन व सायली ठाणेकर यांनी शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या या आश्रमशाळेची वर्गखोल्यांची कमतरता लक्षात घेऊन इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे साडेसहा लाख रुपये खर्च करून दोन खोल्या बांधून दिल्या. आदिवासी विद्यार्थ्यांबाबत संवेदनशील असणाऱ्या ठाण्यातील वीणाताई ज्ञाते या वाडा तालुक्यातील नांदणी-गायगोठा (कळंभई) येथील अरविंद स्मृती संचलित आश्रमशाळेच्या संपर्कात आल्या. तेथील अडचणी पाहून दरवर्षी त्यांना औषधे, सतरंज्या, पांघरूणे मिळवून देणे अशी मदत करीत असतात. यामध्ये त्यांचे सीए असलेले पती मिलिंद हे त्यांना मदत करीत असतात. अशातच २०१५ साली वीणातार्इंची कन्या सायली ज्ञाते हिचा विवाह ठाण्यातील शिर्वन ठाणेकर यांच्याशी ठरला. त्यावेळी वीणातार्इंनी शिर्वनच्या पालकांशी संवाद साधून अहेराची रक्कम आश्रमशाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी खर्च करण्यासाठी सुचविले. लग्नपत्रिकेतही अहेराची रक्कम या सामाजिक कार्यासाठी वापरणार असल्याची कल्पना अन्य आप्तांना दिली. अहेराच्या रकमेत आपल्याकडील रकमेची भर घालून वर्गखोल्यांचे बांधकाम केले. दुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन १९९८ साली ही आश्रमशाळा सुरू झाली. आज ६५० विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये ३१० विद्यार्थिनी आहेत. आज सुसज्ज अशा बांधलेल्या वर्गखोल्यांमध्ये येथील विद्यार्थी मोठ्या आनंदाने शिक्षण घेत आहेत.>आश्रमशाळेतील समस्या सोडविण्यासाठी वीणाताई ज्ञाते या वेळोवेळी आम्हाला सहकार्य करीत असतात. त्यांच्या या कार्यामुळे आम्हालाही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन संस्कारित करण्यासाठी प्रेरणा मिळते.- संगीता भोईर, मुख्याध्यापिका