शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलागुणांमुळे रखडला दहावीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 22:03 IST

राज्य शासनाकडून ऐनवेळी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - राज्य शासनाकडून ऐनवेळी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वाढीव गुणांचा समावेश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये करण्याचे काम बोर्डाकडून सुरू असल्याने दहावीच्या निकालास विलंब होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
 
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतो, यंदाही बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणे अपेक्षित होते. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये कला गुणांचे वाढीव गुण समाविष्ट करण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आल्याने निकाल वेळेवर लावण्यास विलंब लागत आहे.
 
राज्य शासनाने ७ जानेवारी २०१७ रोजी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रात प्राविण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यपध्दती निश्चित केली. या निर्णयाची कार्यवाही मार्च २०१८ मध्ये होणाºया दहावीच्या परीक्षेपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक १४ मार्च २०१७ रोजी शासनाकडून शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले, त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्च २०१८ ऐवजी मार्च २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी काढले.
 
यंदाच्या वर्षी मुंबई विभागातून सर्वाधिक ३० हजार विद्यार्थी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागातून २५ हजार तर कोकण विभागातून ५ हजार विद्यार्थींचा समावेश आहे. त्यांच्या गुणपत्रिकेमध्ये या कलागुणांची नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. कला गुणांची नोंद पहिल्यांदाच केली जात असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार काळजीपूर्वक त्या गुणांची नोंद करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी वेळ लागत असल्याने यंदा दहावीच्या निकालास विलंब झाला आहे.
 
दहावीचा निकाला पुढच्या आठवडयात लावला जाईल त्याबाबतची निकालाची तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर करू तरी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावरून उठणाºया अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.