शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पूल सुस्थितीत असल्याचा केला होता दावा

By admin | Updated: August 4, 2016 05:35 IST

सावित्री नदीवरील मंगळवारी रात्री कोसळलेला पूल हा सुस्थितीत होता.

महाड- सावित्री नदीवरील मंगळवारी रात्री कोसळलेला पूल हा सुस्थितीत होता. तसेच हा पूल कमकुवत असल्याचे किंवा कमकुवतपणाचे लक्षण यापूर्वीच्या पाहणीत आढळून आलेले नाही, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. सन १९२८ साली ब्रिटिश काळात हा पूल बांधण्यात आला होता. त्या पुलाची रचना दगडी कमानीच्या बांधकाम स्वरूपाची असल्याची माहिती महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सुरवसे यांनी दिली. या पुलाला ११ मीटर लांबीचे १७ गाळे होते, तर पुलाची लांबी १८० मीटर व रुंदी ६ मीटर होती, असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावरून वाहतूक सुरळीत होती. गेल्या महिन्यापासून सावित्री नदीच्या क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तसेच महाबळेश्वर येथे ४१०.६० मिमी इतका पाऊस झाल्याने सावित्री नदीला पूर आला. या पाण्याच्या अतिवेगाने प्रवाहाच्या दाबाने हा सावित्री पूल वाहून गेल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचा दावा महामार्ग विभागाने केला आहे. मात्र हा दावा हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे.>चालकासह पुत्रही वाहून गेलापुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका बसचे चालक श्रीकांत शामराव कांबळे (५३) हे मूळचे हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी होते. त्यांचा मुलगा महेंद्र (१७) हाही याच बसमधून प्रवास करीत होता. त्यामुळे कांबळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजापूर-बोरीवली बसचे चालक गोरखनाथ सीताराम मुंडे (४५) हे परभणीतील गंगाखेड तालुक्यातील अंतरवेली येथील रहिवासी होते. गोरखनाथ चार वर्षांपूर्वी चिपळूण आगारात चालक या पदावर रुजू झाले होते. मुंडे यांच्या नातेवाईकांसह अंतरवेली येथील अनेकांनी महाडकडे धाव घेतली आहे. गोरखनाथ मुंडे यांच्या परिवारात वडील, पत्नी, मुलगा, ३ मुली, दोन जावई, भाऊ, नातू असल्याची माहिती मिळाली.