शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

‘सर्किट बेंच’ला मंजुरी

By admin | Updated: May 13, 2015 00:54 IST

मंत्रिमंडळात ठराव : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत वकीलांचा जल्लोष

कोल्हापूर / मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ स्थापन करावे, अशी शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना करण्याचा ठराव मंगळवारी मुंबईत मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. गेल्या २५ वर्षांच्या निर्णायक लढ्याच्या पहिल्या टप्प्यास अखेर यश प्राप्त झाल्याने या सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकारांनी जिल्हा न्यायालयासमोर जल्लोष केला. फटाक्यांच्या आतषबाजीसह साखर-पेढे वाटप करून राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. राज्यमंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत पुणे येथेही असेच फिरते खंडपीठ स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची केवळ विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. याखेरीज पुणे, अमरावती, सोलापूर येथेही स्वतंत्र फिरते खंडपीठ सुरु करण्याची मागणी केली जात होती. अखेरीस कोल्हापूरची शिफारस करण्याचा निर्णय झाला.मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील सुमारे १७ हजार वकील गेल्या २५ वर्षांपासून लढा देत आहेत. सर्किट बेंचसाठी ‘आर या पार’ची लढाई सुरू ठेवून जोपर्यंत राज्य सरकार व उच्च न्यायालय निर्णय घेत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार वकिलांनी केला होता. त्यांच्या या लढ्याला राजकीय, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सर्किट बेंचसाठी मंत्रिमंडळाच्या ठरावाची मागणी केली होती. त्यानुसार कृती समितीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी लावून धरली आणि वकिलांच्या या मागणीची दखल फडणवीस यांनी घेत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘सर्किट बेंच’चा ठराव मंजूर केला. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी नियोजित जागा व आर्थिक तरतुदींसह मंजुरी देण्यात आली. या निर्णयाची माहिती पालकमंत्री पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांना फोनवरून दिली. जाधव यांनी काही क्षणातच ही माहिती खंडपीठ कृती समितीला सांगितली. बैठकीत काय निर्णय होतो, या चिंतेत सकाळपासून बसलेल्या वकिलांच्या कानावर ही आनंदाची बातमी पडताच त्यांनी जल्लोष सुरू केला. जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन वकिलांनी राज्य शासनाच्या अभिनंदनाच्या घोषणा दिल्या. प्रसारमाध्यमांसह राजकीय, सामाजिक संघटना यांचेही त्यांनी आभार मानले. फटाक्यांची आतषबाजी, वकिलांचा जल्लोष आणि साखर-पेढे वाटपामुळे न्यायालयाच्या परिसरात चैतन्याचे वातावरण होते. (प्रतिनिधी)अशी होईल पुढील प्रक्रिया‘सर्किट बेंच’चा ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला. तो गुणात्मक व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून पूर्ण करण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना सादर करतील. त्यानंतर उच्च न्यायालय राज्यपालांशी पत्रव्यवहार करून राज्य शासनाच्या मंजुरीने सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन करीत असल्याचे कळवील, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी दिली. कोल्हापूरच्या इतिहासातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनेक वर्षे आंदोलने, संघर्ष सुरू असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचे समाधान आहे. सहा जिल्ह्यांतील तब्बल ५३ हजार खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या लोकांचे हेलपाटे या निर्णयामुळे वाचतील. राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली आहे. बार असोसिएशनच्या पातळीवर पुढील पाठपुरावा व्हायला हवा. उन्हाळी सुटीनंतर हे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हायला हरकत नाही. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर२५ वर्षांच्या संघर्षाला बळकटी काय आहे सर्किट बेंच ? / वृत्त ५