शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

गावपळणीसाठी चिंदरकर गुराढोरांसह वेशीबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:28 IST

मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे.

- कपिल गुरवआचरा (जि. सिंधुदुर्ग) : मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे. गावपळणीसाठी गावकऱ्यांनी शनिवारी गाव सोडून गुराढोरांसह गावच्या वेशीबाहेर मुक्काम केला आहे. ग्रामदेवता श्री देव रवळनाथाने दिलेल्या आदेशानुसार पुढील तीन दिवस गावाबाहेर राहून गावकरी पुन्हा आपल्या घरी परततील.मालवण शहरापासून २२ किलोमीटरवर चिंदर आहे. या गावची गावपळण दर तीन वर्षांनी होते. मात्र, मागील आठ वर्षांत काही अडचणींमुळे ती झाली नाही. मात्र, यावर्षी तिला मुहूर्त मिळाला. शनिवारी दुपारी तीन वाजता गावातील लोकांनी आपल्या घरादाराला कुलूप लावून, दारावर माडाचे सावळे लावून, घराभोवती राखेचे रिंगण आखून गाव सोडला. गावसीमेच्या बाहेर जाताना सर्व साहित्य गुरेढोरे, पाळीव प्राणी, कोंबड्या यांच्यासह पुढील तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी गावाला आणि घराला निरोप दिल्याने गाव सुनसान झाले आहे.या काळात गावातील शाळेसह सर्व शासकीय कार्यालयेही बंद असणार आहेत.ग्रामस्थांनी वेशीबाहेर माळरानावर तात्परत्या झोपड्या उभारल्या आहेत. जनावरांसाठी गोठा उभारला आहे. तीन दिवस लोकं एकत्रित स्नेहभोजन, विविध सामूहिक कार्यक्रम, नाचगाणी, भजनांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमदेखील करणार आहेत, तर काही मंडळी तीन दिवस गावाकडे जायचे नसल्याने एखाद्या सहलीचे आयोजन करूनही दौराही करणार आहेत.सिंधुदुर्गात गेल्या ३०० हून अधिक वर्षांपासून ‘गावपळण’ परंपरा चालत आली आहे. आचरा, चिंदर आणि वायंगणी या गावात आजही ती पाळली जाते. गावपळणीच्या तीन दिवसांत गावात फक्त आणि फक्त भूताखेतांचा वावर असतो, असा येथील लोकांचा समज असल्याने गावकरीच नव्हे, तर परगावची मंडळी या गावाकडे फिरकत नाहीत.>अशी ठरते गावपळणीची तारीखत्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसºया दिवशी रवळनाथाचा अवसरी (देवताचा तरंग घेणारा) गावपळणीविषयी भाष्य करतो. तद्नंतर गावातील मानकरी श्री देव रवळनाथाच्या पाषाणाला कौल लावतात. रवळनाथाने उजवा कौल दिल्यानंतर गावपळणीची तारीख गावकºयांसमोर गावचे मानकरी जाहीर करतात.