शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गावपळणीसाठी चिंदरकर गुराढोरांसह वेशीबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:28 IST

मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे.

- कपिल गुरवआचरा (जि. सिंधुदुर्ग) : मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे. गावपळणीसाठी गावकऱ्यांनी शनिवारी गाव सोडून गुराढोरांसह गावच्या वेशीबाहेर मुक्काम केला आहे. ग्रामदेवता श्री देव रवळनाथाने दिलेल्या आदेशानुसार पुढील तीन दिवस गावाबाहेर राहून गावकरी पुन्हा आपल्या घरी परततील.मालवण शहरापासून २२ किलोमीटरवर चिंदर आहे. या गावची गावपळण दर तीन वर्षांनी होते. मात्र, मागील आठ वर्षांत काही अडचणींमुळे ती झाली नाही. मात्र, यावर्षी तिला मुहूर्त मिळाला. शनिवारी दुपारी तीन वाजता गावातील लोकांनी आपल्या घरादाराला कुलूप लावून, दारावर माडाचे सावळे लावून, घराभोवती राखेचे रिंगण आखून गाव सोडला. गावसीमेच्या बाहेर जाताना सर्व साहित्य गुरेढोरे, पाळीव प्राणी, कोंबड्या यांच्यासह पुढील तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी गावाला आणि घराला निरोप दिल्याने गाव सुनसान झाले आहे.या काळात गावातील शाळेसह सर्व शासकीय कार्यालयेही बंद असणार आहेत.ग्रामस्थांनी वेशीबाहेर माळरानावर तात्परत्या झोपड्या उभारल्या आहेत. जनावरांसाठी गोठा उभारला आहे. तीन दिवस लोकं एकत्रित स्नेहभोजन, विविध सामूहिक कार्यक्रम, नाचगाणी, भजनांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमदेखील करणार आहेत, तर काही मंडळी तीन दिवस गावाकडे जायचे नसल्याने एखाद्या सहलीचे आयोजन करूनही दौराही करणार आहेत.सिंधुदुर्गात गेल्या ३०० हून अधिक वर्षांपासून ‘गावपळण’ परंपरा चालत आली आहे. आचरा, चिंदर आणि वायंगणी या गावात आजही ती पाळली जाते. गावपळणीच्या तीन दिवसांत गावात फक्त आणि फक्त भूताखेतांचा वावर असतो, असा येथील लोकांचा समज असल्याने गावकरीच नव्हे, तर परगावची मंडळी या गावाकडे फिरकत नाहीत.>अशी ठरते गावपळणीची तारीखत्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसºया दिवशी रवळनाथाचा अवसरी (देवताचा तरंग घेणारा) गावपळणीविषयी भाष्य करतो. तद्नंतर गावातील मानकरी श्री देव रवळनाथाच्या पाषाणाला कौल लावतात. रवळनाथाने उजवा कौल दिल्यानंतर गावपळणीची तारीख गावकºयांसमोर गावचे मानकरी जाहीर करतात.