शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

गावपळणीसाठी चिंदरकर गुराढोरांसह वेशीबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:28 IST

मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे.

- कपिल गुरवआचरा (जि. सिंधुदुर्ग) : मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे. गावपळणीसाठी गावकऱ्यांनी शनिवारी गाव सोडून गुराढोरांसह गावच्या वेशीबाहेर मुक्काम केला आहे. ग्रामदेवता श्री देव रवळनाथाने दिलेल्या आदेशानुसार पुढील तीन दिवस गावाबाहेर राहून गावकरी पुन्हा आपल्या घरी परततील.मालवण शहरापासून २२ किलोमीटरवर चिंदर आहे. या गावची गावपळण दर तीन वर्षांनी होते. मात्र, मागील आठ वर्षांत काही अडचणींमुळे ती झाली नाही. मात्र, यावर्षी तिला मुहूर्त मिळाला. शनिवारी दुपारी तीन वाजता गावातील लोकांनी आपल्या घरादाराला कुलूप लावून, दारावर माडाचे सावळे लावून, घराभोवती राखेचे रिंगण आखून गाव सोडला. गावसीमेच्या बाहेर जाताना सर्व साहित्य गुरेढोरे, पाळीव प्राणी, कोंबड्या यांच्यासह पुढील तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी गावाला आणि घराला निरोप दिल्याने गाव सुनसान झाले आहे.या काळात गावातील शाळेसह सर्व शासकीय कार्यालयेही बंद असणार आहेत.ग्रामस्थांनी वेशीबाहेर माळरानावर तात्परत्या झोपड्या उभारल्या आहेत. जनावरांसाठी गोठा उभारला आहे. तीन दिवस लोकं एकत्रित स्नेहभोजन, विविध सामूहिक कार्यक्रम, नाचगाणी, भजनांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमदेखील करणार आहेत, तर काही मंडळी तीन दिवस गावाकडे जायचे नसल्याने एखाद्या सहलीचे आयोजन करूनही दौराही करणार आहेत.सिंधुदुर्गात गेल्या ३०० हून अधिक वर्षांपासून ‘गावपळण’ परंपरा चालत आली आहे. आचरा, चिंदर आणि वायंगणी या गावात आजही ती पाळली जाते. गावपळणीच्या तीन दिवसांत गावात फक्त आणि फक्त भूताखेतांचा वावर असतो, असा येथील लोकांचा समज असल्याने गावकरीच नव्हे, तर परगावची मंडळी या गावाकडे फिरकत नाहीत.>अशी ठरते गावपळणीची तारीखत्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसºया दिवशी रवळनाथाचा अवसरी (देवताचा तरंग घेणारा) गावपळणीविषयी भाष्य करतो. तद्नंतर गावातील मानकरी श्री देव रवळनाथाच्या पाषाणाला कौल लावतात. रवळनाथाने उजवा कौल दिल्यानंतर गावपळणीची तारीख गावकºयांसमोर गावचे मानकरी जाहीर करतात.