शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना

By admin | Updated: August 4, 2016 04:33 IST

राज्यातील माता-बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली

मुंबई : राज्यातील माता-बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येतील. त्याचबरोबर सध्या सरकारी सेवेतील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य सेवेबाबत नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर, रवींद्र फाटक आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले, सरकारी रुग्णालयांतील खाटा व उपचार घेणाऱ्यांची संख्या विचारात घेता आवश्यक तेवढे डॉक्टर उपलब्ध होत नाही. सरकारी, पालिका व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी ६,५९५ एमबीबीएस डॉक्टर बाहेर पडतात. १,१३९ पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा उपलब्ध आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे सर्वच डॉक्टर सरकारी सेवेत येत नाहीत. दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या व सरकारी रुग्णालयांत आवश्यक असलेली डॉक्टरांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने खासगी-सहकारी भागीदारी तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.राजीव गांधी जीवनदायी योजनेतील त्रुटी दूर करून राज्यात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत विशेषत: वृद्धापकाळात व ५० वर्षांनंतर होणारे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू यासारख्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या धर्तीवर बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>माता बालमृत्यू, अर्भकमृत्यूू रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून गरोदर मातेची प्रसूती होईपर्यंत काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी १०० प्रसूतींच्या मागे डॉक्टरांना चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.