शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना

By admin | Updated: August 4, 2016 04:33 IST

राज्यातील माता-बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली

मुंबई : राज्यातील माता-बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येतील. त्याचबरोबर सध्या सरकारी सेवेतील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य सेवेबाबत नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर, रवींद्र फाटक आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले, सरकारी रुग्णालयांतील खाटा व उपचार घेणाऱ्यांची संख्या विचारात घेता आवश्यक तेवढे डॉक्टर उपलब्ध होत नाही. सरकारी, पालिका व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी ६,५९५ एमबीबीएस डॉक्टर बाहेर पडतात. १,१३९ पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा उपलब्ध आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे सर्वच डॉक्टर सरकारी सेवेत येत नाहीत. दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या व सरकारी रुग्णालयांत आवश्यक असलेली डॉक्टरांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने खासगी-सहकारी भागीदारी तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.राजीव गांधी जीवनदायी योजनेतील त्रुटी दूर करून राज्यात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत विशेषत: वृद्धापकाळात व ५० वर्षांनंतर होणारे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू यासारख्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या धर्तीवर बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>माता बालमृत्यू, अर्भकमृत्यूू रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून गरोदर मातेची प्रसूती होईपर्यंत काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी १०० प्रसूतींच्या मागे डॉक्टरांना चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.